वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना


वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. गरबा खेळून झाल्यानंतर अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने ४६ वर्षीय फाल्गुनी राजेश शहा यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून उत्सवी वातावरणात दु:खाची छाया पसरली आहे.


ओमनगर परिसरातील विघ्नेश्वर मंडळात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भव्य गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक रहिवासी असलेल्या फाल्गुनी शहा या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. मात्र, काही वेळ गरबा खेळल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणांतच त्या जमिनीवर कोसळल्या.


स्थानिकांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात हलवले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा तीव्र झटका हा मृत्यूचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.


या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे शहा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील रहिवाशांनीही या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.


नवरात्रोत्सवाच्या उत्सवी वातावरणात घडलेली ही घटना सर्वांनाच चटका लावून गेली आहे. आनंदाच्या क्षणात मृत्यूने अचानक दार ठोठावल्याने उत्सवामध्ये शोकाची सावली पसरली आहे..

Comments
Add Comment

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी महत्वाची अपडेट

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पातील

Iran-US-Israel War : अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीबद्दल इराणने केली यूएईकडून भरपाईची मागणी

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेतील देशांसमोर मोठ्या अडचणी उभ्या

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरी विजेता होणार मालामाल; फॉर्च्युनर कारसह मिळणार लाखोंची बक्षिसे

कुस्तीप्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच

पंतप्रधान मोदींचा विक्रम, सर्वाधिक ८९३१* दिवस सरकार प्रमुख

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे नेतृत्व करत सार्वजनिक पदावर दीर्घकाळ काम करण्याचा नवा विक्रम

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या