वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना


वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. गरबा खेळून झाल्यानंतर अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने ४६ वर्षीय फाल्गुनी राजेश शहा यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असून उत्सवी वातावरणात दु:खाची छाया पसरली आहे.


ओमनगर परिसरातील विघ्नेश्वर मंडळात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भव्य गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक रहिवासी असलेल्या फाल्गुनी शहा या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. मात्र, काही वेळ गरबा खेळल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणांतच त्या जमिनीवर कोसळल्या.


स्थानिकांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात हलवले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा तीव्र झटका हा मृत्यूचे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.


या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे शहा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील रहिवाशांनीही या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.


नवरात्रोत्सवाच्या उत्सवी वातावरणात घडलेली ही घटना सर्वांनाच चटका लावून गेली आहे. आनंदाच्या क्षणात मृत्यूने अचानक दार ठोठावल्याने उत्सवामध्ये शोकाची सावली पसरली आहे..

Comments
Add Comment

राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ - गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचे संकेत; मदरशांची होणार सखोल पडताळणी

मुंबई : प्रलोभने दाखवून किंवा बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची अशी झाली निवड

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी

शुभमंगल सावधान! अखेर दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मीका मंदाना यांचा विवाहसोहळा संपन्न झाला

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील सर्वांची आवडती जोडी आणि चाहते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते असे

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष, आवाजी मतदानाने निवड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबईत वरळीच्या डोममधील हॉलमध्ये बैठक झाली. या

जिल्हा नियोजन निधी भूगोलावर ठरवू नका, त्या-त्या जिल्ह्याच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घ्या! - आमदार निलेश राणे विधानसभेत कडाडले

लहान जिल्ह्यांना सरसकट ५०० कोटी, तर मोठ्या जिल्ह्यांना १ हजार कोटींचा निधी द्या मुंबई : "जिल्हा नियोजन निधी केवळ

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा