IND vs PAK Final: भारताने जिंकला टॉस, पाकिस्तानला दिले फलंदाजीचे निमंत्रण


दुबई: आशिया कपच्या फायनलमध्ये आज भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ समोरासमोर आहेत. ४१ वर्षांच्या इतिहासात हे दोन्ही संघ पहिल्यांदा फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. या सामन्यात भारताने टॉस जिंकला आहे. भारताने पाकिस्तानला फलंदाजीसाठी निमंत्रित केले असून ते गोलंदाजी करणार आहेत.


हार्दिक पांड्या या सामन्यात खेळत नाही आहे. त्याच्या जागी रिंकु सिंहला संधी मिळाली आहे. गेल्या सामन्यात हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता. एका षटकाच्या गोलंदाजीनंतर तो मैदानाबाहेर गेला होता. तेव्हापासून तो फायनल खेळेल की याबाबत साशंकता होती.


आशिया कपमध्ये आतापर्यंत भारताचे अभियान विजयी राहिले आहे. त्यांनी सलग ६ सामने जिंकत फायनल गाठली आहे. तर पाकिस्तानला दोन सामन्यांत पराभव मिळाला आहे. दोन्ही वेळेला भारतानेच पाकिस्तानला धूळ चारली आहे.


भारताचे संभाव्य प्लेईंग ११: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार) तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.


पाकिस्तानचे संभाव्य प्लेईंग ११ : साहिबजादा फरहान, फखर जमां, सैम अयूब, सलमान अली आगा, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), हुसैन तलत, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन शाह आफरीदी, अबरार अहमद आणि हारिस रऊफ.


Comments
Add Comment

IND vs PAK Final: फायनलच्या आधी टीम इंडियाला मोठा झटका

दुबई: आशिया कपचा फायनल सामना आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि

IND vs PAK Final : भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यासाठी दुबई स्टेडियम हाऊसफुल्ल!

४१ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती; २८ हजार क्रिकेट चाहत्यांची गर्दी, महागडी प्रीमियम तिकिटे अजूनही

'ISPL'चा तिसरा सीझन भव्यदिव्य, एमव्हीपीला मिळणार ब्रँड न्यू 'पोर्शे ९११' कार!

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग २०२६, सीझन ३ मध्ये ८ संघांचा समावेश; ५ ऑक्टोबरपासून १०१ शहरांमध्ये निवड चाचण्या

Mithun Manhas: अनपेक्षित! मिथुन मन्हास यांची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी एक आश्चर्यकारक नाव समोर आलं आहे. दिग्गजांची नावं

Asia Cup 2025 Final: ट्रॉफीवरून वाद, सूर्यकुमार ट्रॉफी स्वीकारणार का?

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. हा महत्त्वाचा सामना दुबई

क्रिकेटप्रेमींसाठी मोठा दिवस !आज भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया कपचा फायनल सामना

दुबई: क्रिकेटप्रेमींसाठी आज मोठा दिवस आहे. आशिया कप २०२५ चा अंतिम सामना पारंपरिक प्रतिस्पर्धक भारत आणि