Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

IND vs PAK Final: फायनलच्या आधी टीम इंडियाला मोठा झटका

IND vs PAK Final: फायनलच्या आधी टीम इंडियाला मोठा झटका

दुबई: आशिया कपचा फायनल सामना आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाईल. या स्पर्धेच्या ४१ वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडतेय जेव्हा फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने आहेत. मात्र या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.

हार्दिक पांड्या या सामन्यात खेळत नाही आहे. त्याच्या जागी रिंकु सिंहला संधी मिळाली आहे. गेल्या सामन्यात हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता. एका षटकाच्या गोलंदाजीनंतर तो मैदानाबाहेर गेला होता. तेव्हापासून तो फायनल खेळेल की याबाबत साशंकता होती.

आशिया कपमध्ये आतापर्यंत भारताचे अभियान विजयी राहिले आहे. त्यांनी सलग ६ सामने जिंकत फायनल गाठली आहे. तर पाकिस्तानला दोन सामन्यांत पराभव मिळाला आहे. दोन्ही वेळेला भारतानेच पाकिस्तानला धूळ चारली आहे.

भारताचे संभाव्य प्लेईंग ११: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार) तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

पाकिस्तानचे संभाव्य प्लेईंग ११ : साहिबजादा फरहान, फखर जमां, सैम अयूब, सलमान अली आगा, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), हुसैन तलत, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन शाह आफरीदी, अबरार अहमद आणि हारिस रऊफ.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा