मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, पालघर, रायगडला रेड अलर्ट

कामाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या महापालिकेच्या सूचना


मुंबई (प्रतिनिधी) : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.


२८ सप्टेंबर व्यतिरिक्त २९ सप्टेंबर रोजीही राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शनिवारी सकाळीही मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. कोकण-गोवा मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी विांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता रविवारपाठोपाठ सोमवारीही मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.



ठाणे, पालघर, रायगडला रेड अलर्ट


हवामान खात्याने रविवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात अधूनमधून पाऊस पडत आहे. दुसरीकडे, धुळे, नंदुरबार आणि जळगाव वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. २८ सप्टेंबरसाठी राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.



सतर्कता बाळगण्याचे आवाहन


हवामान विभागाने पुढील दोन दिवस (दि. २८, २९ सप्टेंबर) राज्यात ऑरेज रेड अर्लट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सभाव्य अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अनुमानानुसान संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आपत्कालीन संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Shocking Video : किळसवाणा प्रकार! दादरमध्ये इडली बनवण्यासाठी चक्क शौचालयाच्या पाण्याचा वापर; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : कामावर जाण्याची घाई आणि वेळेची कमतरता यामुळे अनेक मुंबईकर चाकरमानी सकाळचा नाश्ता रेल्वे स्टेशनबाहेरील

Passengers Stranded At Mumbai Airport : मुंबईत एअर इंडियाची विमानसेवा कोलमडली; ताटकळलेल्या प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) १८ मे रोजी एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया

Sion Flyover Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सायन उड्डाणपूल १५ ऑगस्टला खुला होण्याची शक्यता

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शीव (Sion)

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे अंधेरीतील लाडक्या बहिणींचा

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू