राज्याला पावसाचा दणका; मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात अलर्ट


मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून (IMD) प्राप्त झालेल्या पूर्वामानानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात २७ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये ऑरेज आणि रेड अर्लट असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


मध्य महाराष्ट्र आणि कोकणात २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असून २८ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात २७ सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ आणि २८ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.



नागरिकांना आवाहन:-


* नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत सूचनांचे पालन करावे.


* धोकादायक भागात जाणे टाळावे.


* पूर प्रवण क्षेत्रात जाणे टाळावे.


* वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे.


* पुरापासुन बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी.


* पुराच्या आपत्तीपासुन वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे.


* पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे.


* पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना, रस्ता ओलांडू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.



भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अनुमानुसार संभाव्य पूर परिस्थिती निमार्ण होण्याची शक्यता असलेले जिल्ह्यांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक-


१. धाराशीव-०२४७२-२२७३०१


२. सोलापूर- ०२१७-२७३१०१२


३. बीड-०२४४२-२९९२९९


४. अहिल्यानगर ०२४५-२३२३८४४


५. परभणी-०२४५२-२२६४००


६. नांदेड-०२४६२-२३५०७७


७. गडचिरोली-०७१३२-२२२०३१


८. रायगड ८२७५१५२३६३


९. रत्नागिरी- ७०५७२२२३३


१०. पालघर- ०२५२५- २९७४७४


११. सिंधुदुर्ग-०२३६२ - २२८८४७


१२. ठाणे- ९३७२३३८८२७


१३. पुणे- ९३७०९६००६१


१४. सातारा-०२१६२ - २३२३४९


१५. कोल्हापूर-०२३१ - २६५९२३२


१६. लातूर- ०२३८२ - २२०२०४


१७. मुंबई शहर आणि उपनगर- १९१६/०२२ ६९४०३३४४.


मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र २४X७ अधिकारी/कर्मचारी उपलब्ध कार्यरत आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संपर्क क्रमांक:- ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९, ९३२१५८७१४३.


Comments
Add Comment

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील