मुंबई-ठाण्याला पावसाने झोडपले; ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट

राज्यात रात्रभर मुसळधार पाऊस


मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले असून, मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई आणि ठाण्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागांत पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते वाहतूक कोंडी आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे.


राज्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, तरीही पावसाचा जोर थांबण्याचे नाव घेत नाहीये.



हवामान विभागाचे विविध जिल्ह्यांसाठी 'अलर्ट'


भारतीय हवामान विभागाने (IMD) आज अनेक भागांसाठी दक्षतेचा इशारा जारी केला आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, सकाळपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे.



पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात स्थिती गंभीर


पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या घाटमाथ्यासाठी आज 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पुण्यात मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे.


धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने कहर केला आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे भूम आणि परंडा परिसरातील नळी, दुधना आणि बानगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नद्या पुन्हा धोक्याच्या पातळीबाहेर प्रवाहित झाल्या आहेत.



जालन्यात 'रेड अलर्ट'


जालना जिल्ह्याला आज 'ऑरेंज अलर्ट' आणि उद्या 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता आहे.


गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, पुन्हा हवामान खात्याने इशारा दिल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.


याव्यतिरिक्त, गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर जालना आणि इतर काही भागांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


एकंदरीत, बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाचे सत्र सुरूच असून, विशेषतः कोकण आणि मराठवाड्यासाठी हे पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. अतिवृष्टीमुळे शेती आणि नद्यांची स्थिती गंभीर झाली असून, प्रशासनाने आणि नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या या नैसर्गिक संकटातून लवकर दिलासा मिळणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

Smriti Mandhana Palash Muchhal : 'ती' म्हणाली 'हो'! डीवाय पाटील स्टेडियमवर 'रोमान्सचा सिक्सर', पलाश मुच्छलनं स्मृतीला गुडघ्यावर बसून केलं प्रपोज; व्हिडिओ पहाच

मुंबई : क्रिकेटपटू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि संगीतकार तथा चित्रपट निर्माता पलाश मुच्छल (Palash Muchhal) लवकरच विवाहबंधनात

नवी यूपीआयची दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूमध्ये मेट्रो प्रवाशांसाठी ओएनडीसी नेटवर्कशी हातमिळवणी

भारत: नवी यूपीआयने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) नेटवर्कशी नुकतीच हातमिळवणी केली आहे. आधीच्या तुलनेत मेट्रो

म्हाडासह इतर शौचालयांच्या देखभालीसाठी आता संस्थांची नेमणूक, मुंबईतील इतर शौचालयेही होणार आता चकाचक आणि दुर्गंधीमुक्त

मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील म्हाडासह इतर ४३०९ शौचालयांची डागडुजी तसेच सुधारणा केल्यानंतर आता याची देखभाल

दादरमधील प्रभाग १९२ कुणाकडे? उबाठा आणि मनसेमध्येच चढाओढ

मुंबई (सचिन धानजी) : उबाठा आणि मनसेची युती होणार असल्याचे बोलले जात असून त्यादृष्टीकोनातून पावले टाकली जात असली

पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्ग ठरतो मुंबई महापालिकेसाठी पांढरा हत्ती, पुन्हा सुमारे दीडशे कोटींची निविदा मागवला

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या ताब्यात पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आल्यानंतर या

महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द, उबाठा आणि मनसेने खरेदी केल्या याद्या, येत्या २७ नोव्हेंबरपर्यंत नोंदवता येणार हरकती

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली