राज्यातील दोन महिला आयएएस अधिकाऱ्यांची बदली


मुंबई : महाराष्ट्रात लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. मागच्या महिन्यात राज्यातील सात आयएएस बदल्या झाल्या. नंतर दोनच दिवसांपूर्वी चंद्रकांत डांगे आणि प्रवीण पुरी यांची बदली करण्यात आली. आता विनिता वैद सिंघल आणि सोनिया सेठी यांची सुद्धा बदली करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून नऊ महिन्यांत राज्यातील अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्यात गेल्या काही महिन्यात आयएएस, आयपीएस आणि पोलीस दलात बदल्या करण्यात आल्या आहेत.


आयएएस अधिकारी विनिता वैद सिंघल या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव होत्या. आता आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यातच त्यांना अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्त करण्यात आले होते. पण १७ एप्रिल रोजी त्यांची बदली झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांची अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली आहे. आयएएस अधिकारी विनिता वैद सिंघल ह्या १९९६ बॅचच्या महाराष्ट्रातील एक वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. मूळच्या हरियाणाच्या असलेल्या विनिता यांनी इंग्रजी साहित्यात एमए केलेले आहे. त्यांनी यापूर्वी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आहे.


आयएएस अधिकारी सोनिया सेठी महसूल आणि वन विभागात मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिव म्हणून कार्यरत होत्या. आता त्या मुंबईत बेस्ट विभागाच्या महाव्यवस्थापक म्हणून काम बघतील. डॉ. सोनिया सेठी या महाराष्ट्र केडरच्या १९९४ बॅचच्या एक वरिष्ठ आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. केली आहे आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून एमए आणि एमबीए केले आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मध्ये अतिरिक्त महानगर आयुक्त आणि राज्य शासनाच्या नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून काम केले होते.


Comments
Add Comment

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी