देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश


मुंबई : देवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिवृत्ताला मान्यता दिली आहे. यामुळे हे मत्स्यविद्यालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदर विकास तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणच्या जनतेला नवे शैक्षणिक दालन निर्माण करून देण्याचा सातत्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.


या संदर्भात दि. २६ ऑगस्ट रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दालनात बैठक झाली होती. यामध्ये सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित होते. या बैठकीच्या इतिवृत्ताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य मध्ये नवीन शासनमान्य विद्यालय यांना मान्यता देऊ नये असा धोरणात्मक निर्णय यापूर्वी झाला होता. मात्र मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये मत्स्य विद्यालय करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले होते. धोरणात्मक निर्णय असल्याने त्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता गरजेची होती. ही मान्यता मिळाली असून मत्स्य विद्यालय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणार असून,देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सौंदाळे येथे वन व महसूल यांच्या मालकीच्या जागेमध्ये होणार आहे. महाविद्यालयाच्या इमारती व सुविधांसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. या महाविद्यालयामुळे पारंपरिक मच्छीमार तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या लोकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसाय विषयक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. देवगड सारख्या किनारपट्टी भागात हे महाविद्यालय उभारले जाणार असल्याने खऱ्या अर्थाने किनारपट्टी भागाला शिक्षण आणि व्यवसायाचा न्याय  मिळणार  आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन