देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश


मुंबई : देवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिवृत्ताला मान्यता दिली आहे. यामुळे हे मत्स्यविद्यालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदर विकास तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणच्या जनतेला नवे शैक्षणिक दालन निर्माण करून देण्याचा सातत्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.


या संदर्भात दि. २६ ऑगस्ट रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दालनात बैठक झाली होती. यामध्ये सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित होते. या बैठकीच्या इतिवृत्ताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य मध्ये नवीन शासनमान्य विद्यालय यांना मान्यता देऊ नये असा धोरणात्मक निर्णय यापूर्वी झाला होता. मात्र मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये मत्स्य विद्यालय करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले होते. धोरणात्मक निर्णय असल्याने त्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता गरजेची होती. ही मान्यता मिळाली असून मत्स्य विद्यालय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणार असून,देवगड तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सौंदाळे येथे वन व महसूल यांच्या मालकीच्या जागेमध्ये होणार आहे. महाविद्यालयाच्या इमारती व सुविधांसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. या महाविद्यालयामुळे पारंपरिक मच्छीमार तसेच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या लोकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवसाय विषयक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. देवगड सारख्या किनारपट्टी भागात हे महाविद्यालय उभारले जाणार असल्याने खऱ्या अर्थाने किनारपट्टी भागाला शिक्षण आणि व्यवसायाचा न्याय  मिळणार  आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा ९ दिवस मेगाब्लॉक! 'या' स्थानकांदरम्यान वाहतूक राहणार बंद, लांबपल्ल्याच्या लोकल ट्रेनला फटका

मुंबई: कर्जत स्थानकाच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक २४

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा

रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्याने सात कंपन्यांची निवड, दोन वर्षांसाठी तब्बल २५७कोटी रुपये करणार खर्च!

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील रस्त्यांखालून तसेच पदपथांखालून विविध सेवा सुविधांचे जाळे पसरले गेलेले असून अनेकदा

महापालिकेच्या केईएम,शीव, नायर रुग्णालयांची भिस्त खासगी सुरक्षेवर, महिन्याला एवढा होतो खर्च...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिका सुरक्षा रक्षक खात्यातील रिक्तपदे वाढतच चाललेली असून आजही महापालिकेच्या