ICCने सूर्यकुमार यादवला ठरवले दोषी, ठोठावला दंड, निर्णयाला BCCI ने दिले आव्हान

दुबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांनंतर वाद सुरूच आहे. या मालिकेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी सामन्यानंतर केलेल्या टिप्पणीमुळे भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला आयसीसी (ICC) च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी त्याला त्याच्या मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.


१४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर सूर्यकुमारने दहशतवादी हल्ल्यातील पीडितांप्रति सहानुभूती व्यक्त करत हा विजय भारतीय लष्करी दलांना समर्पित केला होता. या विधानावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, आयसीसीने याची दखल घेत मॅच रेफ्री रिची रिचर्डसन यांच्यासमोर सुनावणी घेतली. या सुनावणीत सूर्यकुमारने आपण दोषी नसल्याचे सांगितले असले तरी त्याची बाजू फेटाळण्यात आली.


आयसीसीने सूर्यकुमारला राजकीय स्वरूपाची कोणतीही टिप्पणी करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले आहे. यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


याच मालिकेत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ यालाही ३०% मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर सलामीवीर साहिबजादा फरहान याला इशारा देऊन सोडून देण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंनी भारताविरुद्धच्या सामन्यात आक्षेपार्ह हावभाव केले होते, ज्याची तक्रार बीसीसीआयने केली होती.

Comments
Add Comment

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

‘जर-तर’च्या समीकरणावर ठरणार भारताचा सेमीफायनलचा प्रवेश!

धावगती उंचावण्यासाठी दोन्ही सामने फरकाने जिंकावे लागणार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ

हेटमायर आणि पॉवेलमुळे वेस्ट इंडिजने ओलांडला २५० धावांचा टप्पा

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

T20 World Cup 2026 Ind vs SA : आपण पॉवरप्लेमध्येच सामना गमावला - सूर्यकुमार यादव

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा ४३ वा सामना अहमदाबाद येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. हा सामना