मुंबईत ॲप-आधारित वाहन चालकांवर कारवाई; नियम मोडल्यास थेट दंड आणि एफआयआर!

मुंबई : राज्य शासनाच्या नव्या आदेशांनुसार, ॲपच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण (MMRTA) यांनी संयुक्तरित्या विशेष मोहीम राबवत गेल्या काही दिवसांत तब्बल २६३ अवैध वाहनांवर कारवाई करत ₹३.८८ लाखांचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


सरकारने ठरवलेल्या नियमानुसार, ॲप-बेस वाहनचालकांकडे आवश्यक परवाने असणे बंधनकारक असून, प्रवाशांकडून निश्चित दराप्रमाणेच भाडे आकारणे गरजेचे आहे. तसेच वाहनचालकांना मिळणाऱ्या कमाईपैकी किमान ८०% हिस्सा देणे आवश्यक आहे.



दराच्या अटी आणि नियमानुसार सेवा देणे बंधनकारक


मुंबईत अनेक वाहन चालक ठरविलेल्या दरांपेक्षा जास्त भाडे घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यानंतर प्रशासनाने थेट कारवाई सुरू केली आहे. काही चालक विना परवाना वाहतूक करत असल्याचे उघड झाल्यानंतर संबंधितांवर एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. ही कारवाई सांताक्रूझ, अंधेरी आणि मैदान पोलिस ठाण्यांत करण्यात आली आहे.



अधिकृत दर काय आहेत?


ऑटो रिक्षा – पहिल्या १.५ किमीसाठी ₹२६, त्यानंतर प्रति किमी ₹२०.६६


काळी-पिवळी टॅक्सी – पहिल्या १.५ किमीसाठी ₹३१, त्यानंतर ₹२०.६६ प्रति किमी


AC वाहनांसाठी – १०% अधिक भाडे


इलेक्ट्रिक दुचाकी / बाईक टॅक्सी (महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम २०२५) – पहिल्या १.५ किमीसाठी ₹१५, त्यानंतर ₹१०.२७ प्रति किमी



'ॲग्रिगेटर्स पॉलिसी' लागू


राज्यात ॲप-आधारित सेवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'ॲग्रिगेटर्स पॉलिसी' लागू करण्यात आली आहे. परवाना नसलेल्या कंपन्या किंवा चालकांवर याअंतर्गत कारवाई होणार आहे.


मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाद्वारे बेकायदेशीर सेवा देणाऱ्या वाहनचालकांना थेट इशारा दिला आहे की, त्यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक दंड आणि अन्य कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.

Comments
Add Comment

२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; जाणून घ्या कोणत्या दिवशी राहणार सरकारी कार्यालये बंद?

मुंबई : काहीच दिवसांत २०२५ वर्ष निरोप घेईल आणि नवीन वर्षाची सुरुवात होईल. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२६

मुंबईतील १६ भूखंडांचा ई लिलाव होणार

शाळा, रुग्णालय आणि इतर सुविधांसाठी राखीव भूखंडांचा समावेश मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकतीच मुंबईतील

अपात्र गिरणी कामगारांनाही म्हाडाची घरे मिळणार!

कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत मुंबई : कागदपत्रांमधील त्रुटीमुळे म्हाडाचे घर

Mumbai Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! मेगाब्लॉकमुळे मुंबई लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल; तुमच्या प्रवासाचे नियोजन बदला!

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

वायू प्रदूषण हे मुंबईतील सर्वांत गंभीर नागरी आव्हानांपैकी एक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'वायू प्रदूषण हे मुंबईसमोर उभ्या असलेल्या सर्वात गंभीर नागरी आव्हानांपैकी एक आहे.

मालाड रामबागमधील अनेक वर्षांपासूनचा अंधार झाला दूर

रस्त्याच्या विकासासह पिण्याचे पाणी, तुंबणाऱ्या पाण्याचीही मिटली समस्या स्थानिक नगरसेविका योगिता कोळी यांच्या