बाथरूममध्ये सापडल्या ४० मुली! बेकायदेशीर मदरशाचे छांगूर बाबाशी कनेक्शन

लखनऊ : लखनऊजवळील बहराईच जिल्ह्यातील पयागपूर येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी एका अनधिकृत मदरशावर टाकलेल्या छाप्यात बाथरूममध्ये ४० अल्पवयीन मुली सापडल्या. या मुली ९ ते १४ वयोगटातील आहेत.


ही कारवाई पयागपूरचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) अश्विनी पांडे यांच्या पथकाद्वारे करण्यात आली. ग्रामस्थांकडून अनेक दिवसांपासून संशय व्यक्त केला जात होता की, पहेलवाडा परिसरातील या मदरशात काहीतरी संशयास्पद सुरू आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, पोलिस आणि महिला कॉन्स्टेबलच्या मदतीने छापा टाकण्यात आला.


छाप्यादरम्यान मदरशाचा संचालक खलील अहमद याने पथकाला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अधिकाऱ्यांना आत प्रवेश मिळाला. इमारतीची तपासणी केली असता, तिसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये ४० मुली बंदिस्त अवस्थेत आढळल्या. सर्व मुली घाबरलेल्या होत्या.


महिला पोलिसांच्या मदतीने सर्व मुलींना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. मुली खरोखर त्या मदरशात शिक्षणासाठी होत्या का, याचा तपास सुरु आहे.


मदरशाच्या संचालकाविरोधात तपास सुरू असतानाच तो घटनास्थळावरून फरार झाला. त्याची मुलगी फातिमा हिने मात्र आरोप फेटाळून लावत सांगितले की, तेथे कोणताही मदरसा नव्हता, फक्त कोचिंग सेंटर चालवले जात होते. तसेच सर्व मुलींना त्यांच्या पालकांनी घरी घेऊन गेले असल्याचा दावा तिने केला.


या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी खलील अहमदच्या संपत्तीतील अचानक झालेल्या वाढीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. काही वर्षांपूर्वी छोटंसं दुकान चालवणारा खलील आता तीन मजली इमारत व २४ दुकानांचा मालक कसा झाला? याचा छडा लावण्याची मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.


ही घटना अलीकडील उत्रौलातील छंगूर बाबा प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून तपास करण्याची मागणी केली जात आहे.


एसडीएम पांडे यांनी याप्रकरणी एक सविस्तर अहवाल जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला असून, जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी मोहम्मद खालिद यांनी यावर पुढील प्रक्रिया सुरू असल्याची पुष्टी केली. तसेच जिल्ह्यात सध्या ४९५ अनधिकृत मदरसे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

कोणावर अवलंबून राहणे परवडणारे नाही

पंतप्रधान मोदी यांचे स्वाबलंबी बनण्याचे आवाहन; नोएडात आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचे उद्घाटन नोएडा :

टपाली मतानंतरच ईव्हीएम मतांची मोजणी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे निवडणूक आयोगाला

टपाली मतानंतरच ईव्हीएम मतांची मोजणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): गेल्या काही दिवसांपासून मत्तचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे

पंतप्रधानांनी केली अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी

बांसवाडा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानच्या या आदिवासी-बहुल प्रदेशात २८०० मेगावॅटच्या अणुऊर्जा

ऐन दिवाळीत साखरेचे भाव वाढणार

नवी दिल्ली : ऐन दसरा, दिवाळीत साखरेची मागणी वाढण्याची शक्यता असताना केंद्र सरकारने यंदाचा देशांतर्गत साखर

रील बनवणे पडले महागात, पाच जणांचा बुडून मृत्यू

पाटणा : बिहारमधील गयाजी येथे गुरुवारी (२५ सप्टेंबर) एक मोठी दुर्दैवी घटना घडली. खिजरसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत