राज्य सरकारचा पूरग्रस्तांना मोठा दिलासा: मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख, गुरांसाठीही मदत

मुंबई: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने सर्वकष उपाययोजना हाती घेतल्या आहे. पावसाशी संबंधिक विविध दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत ८४ जणांचा बळी गेला आहे. सरकारकडून पंचनामे तसेच पाहणी दौरे युद्धपातळीवर केले जात आहे. तसेच आठ दिवसांच्या आत पूरग्रस्तांना सरकारकडून मदत दिली जात आहे. पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने सर्व यंत्रणा कामाला लावल्या आहेत. त्यांना तातडीने आर्थिक मदत केली जावी अशा प्रकारचे थेट आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या मदतीमध्ये जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी भरपाईचा समावेश आहे.


सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, पूर आणि अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच, या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठीही भरीव मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टरी ८,५०० रुपये तर बागायती पिकांसाठी १७,५०० रुपये मदत दिली जाणार आहे.


याशिवाय, पूर आणि पावसामुळे ज्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांच्यासाठीही नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार, दुभत्या आणि मोठ्या जनावरांच्या मृत्यूप्रकरणी ३७,५०० रुपये तर शेळ्या आणि मेंढ्यांसाठी ४,००० रुपये मदत दिली जाईल.


या मदतीमुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने नुकसानीचे निकष शिथिल करून मदत नागरिकांपर्यंत लवकर पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच, अनेक सामाजिक संस्था आणि मंडळांनीही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा' मंडळाने पूरग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.


हे मदत पॅकेज जाहीर करून सरकारने पूरग्रस्तांना पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे संकटाच्या या काळात त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील