राज्य सरकारचा पूरग्रस्तांना मोठा दिलासा: मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख, गुरांसाठीही मदत

मुंबई: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवली जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने सर्वकष उपाययोजना हाती घेतल्या आहे. पावसाशी संबंधिक विविध दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत ८४ जणांचा बळी गेला आहे. सरकारकडून पंचनामे तसेच पाहणी दौरे युद्धपातळीवर केले जात आहे. तसेच आठ दिवसांच्या आत पूरग्रस्तांना सरकारकडून मदत दिली जात आहे. पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने सर्व यंत्रणा कामाला लावल्या आहेत. त्यांना तातडीने आर्थिक मदत केली जावी अशा प्रकारचे थेट आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या मदतीमध्ये जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी भरपाईचा समावेश आहे.


सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, पूर आणि अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच, या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठीही भरीव मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टरी ८,५०० रुपये तर बागायती पिकांसाठी १७,५०० रुपये मदत दिली जाणार आहे.


याशिवाय, पूर आणि पावसामुळे ज्यांची जनावरे दगावली आहेत, त्यांच्यासाठीही नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार, दुभत्या आणि मोठ्या जनावरांच्या मृत्यूप्रकरणी ३७,५०० रुपये तर शेळ्या आणि मेंढ्यांसाठी ४,००० रुपये मदत दिली जाईल.


या मदतीमुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने नुकसानीचे निकष शिथिल करून मदत नागरिकांपर्यंत लवकर पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच, अनेक सामाजिक संस्था आणि मंडळांनीही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा' मंडळाने पूरग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.


हे मदत पॅकेज जाहीर करून सरकारने पूरग्रस्तांना पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे संकटाच्या या काळात त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

Comments
Add Comment

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ

Kalyan and Badlapur Power Blocks : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवर उद्या आणि परवा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स

मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता

BMC News : प्रत्येक विभागस्तरावर बांधकाम व पाडकाम राडारोडा व्यवस्थापन आराखडा

अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांचे स्पष्ट निर्देश मुंबई : मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी संपूर्ण