Solapur Flood : पहिला महामार्ग बंद अन् आता 'वंदे भारत'लाही फटका...सीना नदीच्या पुरामुळे सोलापूरमध्ये पूरस्थिती गंभीर

सोलापूर : राज्यात पावसाने जोर धरल्यामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती गंभीर झाली आहे. सोलापुर जिल्ह्यातील अहिल्यानगर आणि धाराशिव परिसरातील सीना कोळेगाव, चांदणी, खासापुरी प्रकल्पातून तसेच भोगावती नदीमधून सोडलेले पाणी सीना नदीत आले आहे. यामुळे करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर व दक्षिण सोलापूरसह जवळपास २९ गावांतील शेतकरी आणि नागरिकांचे घर, शेती आणि पिकं पाण्याखाली गेले आहेत. रस्ते जलमय झाले असून राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला आहे. तसेच रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे एक्स्प्रेस व वंदे भारत गाड्या थांबून आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


सोलापूर रेल्वे स्थानकावरच वंदे भारत एक्स्प्रेस थांबून आहे. यासोबतच इतरही तीन एक्स्प्रेस रखडल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोलापुरातल्या माढामधील निमगाव आणि दारफळ या गावांची पाहणी केली. सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. दारफळ, वाकाव, राहुलनगर, उंदरगाव, केवड या गावांना पाण्याने वेढा दिलाय. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिला.



वंदे भारतसह चार एक्स्प्रेस गाड्या अडकल्या


सोलापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेस थांबलेली असून, त्याच मार्गावर आणखी तीन एक्स्प्रेस गाड्या देखील अडकल्या आहेत. यामुळे सामान्य प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ या पूरग्रस्त गावांमध्ये दाखल झाले. सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. विशेषतः दारफळ, वाकाव, राहुलनगर, उंदरगाव आणि केवड गावांना पाण्याने वेढा दिला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांचा पूरग्रस्त भाग दौरा सुरू आहे. याअंतर्गत, सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा त्वरित दौरा करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिला आहे.



मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता


राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तरपणे तपासण्यात आले. हवामान खात्याच्या अहवालानुसार २७ ते २८ सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा अतिवृष्टीची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. या अंदाजानुसार २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भाग, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी २,२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून, फडणवीसांच्या मते प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून मदत त्वरित देण्यात येईल. शिवाय शनिवार आणि रविवार राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासनाला सर्वांनी तत्काळ खबरदारी घेण्याचे आदेश देखील दिले आहेत.

Comments
Add Comment

Nitesh Rane : आता गावागावांतील तलावांमध्ये होणार मत्स्यबीज संवर्धन

- मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; २५ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवणार मुंबई : राज्यातील गाव तलाव,

Water storage : खरीप हंगामावर वरुणराजाची कृपादृष्टी, नाशिकसह इतर विभागांतील पाणीसाठा किती ? 

Nashik : जून महिना कोरडा गेल्यानंतरही झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. त्यामुळे

Panic in Wardha : वर्ध्यात दहशत! १० गावांत हाय अलर्ट जारी; वनविभाग ॲक्शन मोडमध्ये

वर्धा: महाराष्ट्र आणि देशपातळीवर वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मानवी वस्त्यांवर आणि शेती परिसरांवर संकट

Nashik-Mumbai Highway : घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला अन्...महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची