'प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील संपूर्ण निधी खर्च करण्याचे नियोजन करा' - मंत्री नितेश राणे

'मच्छिमारांसाठीचे कल्याणकारी महामंडळ स्थापन्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा'


मुंबई : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी आराखडा तयार करा. तसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करून महिना अखेरपर्यंत हे महामंडळ स्थापन करावे अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.


मंत्रालयात आज प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेविषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी मत्स्य व्यवसाय सचिव एन. रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील मोठा निधी हा पायाभूत सुविधा उभारणीवर खर्च होत असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावीत आणि त्यासाठीचा संपूर्ण निधी खर्च करावा. तसेच जे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू झालेले नाहीत त्यांचे नियोजन प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना २ मध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही करावी. निधी १०० टक्के खर्च करण्याच्या दृष्टीने वैयक्तिक लाभार्थी योजनांवर भर द्यावा. बाब निहाय खर्चाचे नियोजन करावे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.


मंत्री राणे म्हणाले की, मच्छिमारांसाठी स्थापन करण्यात येत असलेले महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी. मच्छिमारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी या महामंडळांच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. त्यामुळे याला प्राधान्य देण्यात यावे. या महिना अखेरीस ही दोन्ही महामंडळे स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.

Comments
Add Comment

Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण करावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग ( जी एम एल आर) प्रकल्प टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके

Bhandup : आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प साकारतोय भांडुप संकुलात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप संकुलातील ७.४ हेक्‍टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या

Bhandup Sewage Treatment Plant : भांडुपचा मल जल शुध्दीकरण प्रकल्प ऑक्टोबर २०२६मध्ये होणार कार्यान्वित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप येथील मल जल शुध्दीकरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होवून येत्या ऑक्टोबर २०२६ पर्यंत

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर साडेतीन हजार झाडांची लागवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर

Dr. Ashwini Joshi : डॉ. अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती, नवा आदेश जारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या बदलीच्या

BEST : कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वीच मेस्मा लागू, रजा मंजुरीवरही निर्बंध

मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमातील १२ कामगार संघटनांच्या संयुक्त कृती