Asia cupमध्ये पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम

अबुधाबी : आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला ५ विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १३३ धावा केल्या आणि पाकिस्तानने १२ चेंडू शिल्लक असताना हे आव्हान सहज पार केले.


श्रीलंकेच्या १३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी ४५ धावांची सलामी भागिदारी केली. पण महिश थीकशनाने दोन्ही सलामीवीरांना सलग बाद करून श्रीलंकेला पुन्हा सामन्यात आणले. सॅम अयुब आणि सलमान आगा यांनाही लागोपाठ बाद करण्यात आले.


पाकिस्तानने १२ धावांत चार विकेट्स गमावल्या होत्या. या कठीण परिस्थितीत मोहम्मद हरिसने १३ धावांची महत्त्वाची खेळी केली. त्यानंतर हुसेन तलत आणि मोहम्मद नवाज यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पाकिस्तानला विजय मिळवून देण्यासाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाज प्रत्येकी ३२ धावांवर नाबाद राहिले. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि महेश थीकशनाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. डावाच्या दुसऱ्या चेंडूवर कुसल मेंडिस एकही धाव न काढता बाद झाला.त्यानंतर पथुम निस्सांका ८ धावा काढून बाद झाला. श्रीलंकेकडून कामिंदू मेंडिसने ५० धावांची झुंजार खेळी केली. कर्णधार चरिथ असलंकाने २० धावा, चमिका करुणारत्नेने १७ धावा आणि कुसल पेरेला आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी १५ धावा केल्या. शाहीन शाह आफ्रिदीने पाकिस्तानकडून सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. हरिस रौफ आणि हुसेन तलत यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर अबरार अहमदनेही एक विकेट घेतली.


या विजयामुळे पाकिस्तानची अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता जिवंत आहे. दरम्यान, सुपर ४ टप्प्यात श्रीलंकेला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि अंतिम फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. क्रिकेट चाहते आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या सामन्याची वाट पाहत आहेत, जी फक्त तेव्हाच शक्य होणार आहे. जेव्हा भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि पाकिस्तान बांगलादेशला पराभूत करण्यात यशस्वी होईल.

Comments
Add Comment

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना

रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर मालिकेत अपयशी

भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिका पराभवामागचे ‘व्हिलन‘ मुंबई : भारतीय संघाला घरच्या मैदानावर

बांगलादेशला निर्णय घेण्यास उद्यापर्यंत वेळ

अन्यथा आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलँड संघाला मिळणार संधी मुंबई : अवघ्या दोन आठवड्यांवर आलेल्या टी-२०

भारत-पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारीला क्रिकेटचे दोन सामने

आयसीसी टी-२० मध्ये महामुकाबला होणार मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कायमच भारत विरुद्ध पाकिस्तान या २ देशांच्या

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील