Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या महापर्वाला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात केली आहे. यंदाचे नवरात्र विशेष म्हणजे ते दहा दिवसांचे आहेत. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला या उत्सवाची सुरूवात झाली, तर दशमी तिथीला उपवास सोडल्यावर हा महापर्व संपेल. नवरात्रात भक्त उपवास ठेवतात, मांसाहार आणि मद्यपान टाळतात. काहीजण पूर्णपणे अनवानी आहार घेतात, तर काहीजण लसूण आणि कांदा देखील टाळतात. त्यांचा विश्वास आहे की देवीच्या आराधनेत कांदा-लसूण सेवन करणे योग्य नाही. या पवित्र काळात भक्त देवीच्या विविध रूपांची पूजा करतात, आरतीत सहभागी होतात आणि भजन-कीर्तनाद्वारे भक्तिभाव व्यक्त करतात. पण खरोखरंच नवरात्रीत लसूण आणि कांदे खाणे पाप असते का? तसेच ते खाल्ल्यानंतर देवीची सेवा करू शकत नाही का? असे प्रश्न अनेकांना पडतात. अनेकांना याबाबत संभ्रम असतात. याबद्दल प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं आहे ते जाणून घेऊयात.



लसूण-कांदा खाल्ल्यास पूजा होईल का? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?


श्रावण, नवरात्र आणि इतर पवित्र सणांच्या काळात लसूण आणि कांदा खाणे योग्य आहे का, हा प्रश्न एका भक्ताने संत प्रेमानंद महाराजांशी विचारला. महाराजांनी स्पष्ट केले की, “संत आणि ऋषींना लसूण व कांदा खाण्यास मनाई असते. कारण त्यांचा सेवन केल्यास तमोगुण वाढतो, ज्यामुळे जप, तप आणि ध्यान यामध्ये अडथळे निर्माण होतात. लसूण आणि कांदा खाणे पाप नाही, कारण हे बटाट्यांसारख्या इतर भाज्यांसारखेच पिकवले जातात. परंतु त्यांच्या विशेष गुणधर्मामुळे साधकांसाठी, जप-तप करणाऱ्यांसाठी आणि दीक्षा घेतलेल्या व्यक्तींसाठी ते निषिद्ध मानले जातात.” महाराजांचे मार्गदर्शन भक्तांसाठी उपयुक्त आहे, जे आपल्या धार्मिक आणि साधनात्मक आचरणात संतुलन ठेवू इच्छितात. प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, “जर कोणी लसूण आणि कांदा खाल्ला असेल तरी तो देवी दुर्गाची सेवा करू शकतो, परंतु देवीला अर्पण केलेल्या नैवेद्यात लसूण आणि कांदा वापरलेला नसावा.”



आधी ‘राधा-राधा’ जप करा आणि मग कांदा खा


भक्तांनी विचारले की, “जेव्हा शाळेतील मुले भेटीसाठी बाहेर जातात, तेव्हा त्यांना कांदा-लसूणाचं जेवण मिळतं. आम्हालाही तिथे जाण्याची इच्छा असते, पण बाहेरून जेवण मिळत नाही. अशा परिस्थितीत काय करावे?” यावर प्रेमानंद महाराजांनी उत्तर दिले, “उपाशी राहू नका. आधी ‘राधा-राधा’ जप करा आणि मग कांदा खा. कांदा देखील थोडे प्रेम निर्माण करतो. संतांनी कांदा निषिद्ध केले कारण त्याचे सेवन तमोगुण वाढवते, आणि भजन करताना सत्वगुण आवश्यक असतात. त्यामुळे कांदा खाणे पापकर्म नाही.” महाराजांनी उदाहरण देत पुढे सांगितले की, “सैन्यात, व्यवसायात किंवा अभ्यासात असलेल्यांना सूट आहे. साधू, महात्मा आणि ईश्वराच्या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना कांदा आणि लसूण खाण्यास मनाई आहे. जरी हे दारू, मासे किंवा मांसासारखे पाप मानले जात नसले तरी, ते मूळतः तामसिक आहेत आणि भक्ती पद्धतींच्या विरुद्ध भावना निर्माण करतात. म्हणून, ते निषिद्ध मानले जातात” असंही महाराजांनी म्हटलं आहे.



कांदा-लसूणवरून भांडण टाळा


प्रेमानंद महाराजांनी भक्तांना मार्गदर्शन केले की, “ज्यांची इच्छा असेल त्यांनी कांदा-लसूण खावे. कौटुंबिक जीवनात अनेकदा कुटुंबातील सदस्य कांदा आणि लसूण खातात, त्यामुळे भक्तीच्या नावाखाली भांडणे करणे योग्य नाही. भांडायची गरज असेल तर स्वयंपाकघरात सर्वांसाठी एकसारखे पदार्थ बनवण्याची विनंती करा. तसेच, कोणाला देवाला नैवेद्य दाखवताना कांदा-लसूण नको वाटत असेल, तर त्यांच्यासाठी वेगळे जेवण बनवू शकता.”



दीक्षा घेतल्यावर कांदा-लसूण खाण्यावर नियम कडक


अशातच दीक्षा घेतल्यानंतर काय नियम पाळावे लागतात याबद्दलही प्रेमानंद महाराजांनी म्हटलंय की, “दीक्षा घेतल्यानंतर कांदा आणि लसूण खाण्यावर अधिक कडक नियम लागू होतो. या काळात भक्तांनी हरीची भक्ती करण्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी कांदा-लसूण खाणे टाळावे. मात्र, ज्यांना मुले आहेत किंवा ज्यांची नोकरीसाठी आवश्यक असते, त्यांच्यासाठी परिस्थितीनुसार विवेकपूर्ण खाणे पाप मानले जात नाही. दीक्षा घेतलेल्या भक्तांनी राधा-राधेचा जप करत नियम पाळावे.”

Comments
Add Comment

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज! आयटीआय ते पिंपळगाव बहुला मार्गावरील युटिलिटी प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

नाशिक : २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) तयारीचा भाग म्हणून नाशिक- त्र्यंबकेश्वर जोडणाऱ्या आयटीआय

BEST ACCIDENT : मुंबईत बेस्ट बसचा पुन्हा थरार, कांदिवलीत दोघांना चिरडले; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

MUMBAI : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. दादर येथील बस

MLA Shivaji Patil : शक्तीपीठ महामार्गाला नाहक विरोध करण्याऐवजी सहकार्य करा

चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांचे आवाहन Mumbai : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांनी जनतेची नाहक दिशाभूल

Maharashtra Kesari Sikandar Shaikh : ‘महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या थारचा भीषण अपघात!’ गाडीचा चक्काचूर; मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचाव

सांगली : महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी किताब पटकावून कुस्तीविश्वात स्वतःचा दबदबा निर्माण करणारा स्टार पैलवान

POK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणावाचा भडका; भीषण हिंसाचार, आंदोलने आणि नेमकी परिस्थिती काय?

Mumbai : पाकव्याप्त काश्मीर (PoK) सध्या एका भीषण अशांततेच्या काळातून जात आहे. रावळकोटसह अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये

Nashik : रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दोन ते तीन दिवसांत बैठक, मंत्री महाजन यांचे आश्वासन

Nashik News : रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात