Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या महापर्वाला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात केली आहे. यंदाचे नवरात्र विशेष म्हणजे ते दहा दिवसांचे आहेत. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला या उत्सवाची सुरूवात झाली, तर दशमी तिथीला उपवास सोडल्यावर हा महापर्व संपेल. नवरात्रात भक्त उपवास ठेवतात, मांसाहार आणि मद्यपान टाळतात. काहीजण पूर्णपणे अनवानी आहार घेतात, तर काहीजण लसूण आणि कांदा देखील टाळतात. त्यांचा विश्वास आहे की देवीच्या आराधनेत कांदा-लसूण सेवन करणे योग्य नाही. या पवित्र काळात भक्त देवीच्या विविध रूपांची पूजा करतात, आरतीत सहभागी होतात आणि भजन-कीर्तनाद्वारे भक्तिभाव व्यक्त करतात. पण खरोखरंच नवरात्रीत लसूण आणि कांदे खाणे पाप असते का? तसेच ते खाल्ल्यानंतर देवीची सेवा करू शकत नाही का? असे प्रश्न अनेकांना पडतात. अनेकांना याबाबत संभ्रम असतात. याबद्दल प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं आहे ते जाणून घेऊयात.



लसूण-कांदा खाल्ल्यास पूजा होईल का? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?


श्रावण, नवरात्र आणि इतर पवित्र सणांच्या काळात लसूण आणि कांदा खाणे योग्य आहे का, हा प्रश्न एका भक्ताने संत प्रेमानंद महाराजांशी विचारला. महाराजांनी स्पष्ट केले की, “संत आणि ऋषींना लसूण व कांदा खाण्यास मनाई असते. कारण त्यांचा सेवन केल्यास तमोगुण वाढतो, ज्यामुळे जप, तप आणि ध्यान यामध्ये अडथळे निर्माण होतात. लसूण आणि कांदा खाणे पाप नाही, कारण हे बटाट्यांसारख्या इतर भाज्यांसारखेच पिकवले जातात. परंतु त्यांच्या विशेष गुणधर्मामुळे साधकांसाठी, जप-तप करणाऱ्यांसाठी आणि दीक्षा घेतलेल्या व्यक्तींसाठी ते निषिद्ध मानले जातात.” महाराजांचे मार्गदर्शन भक्तांसाठी उपयुक्त आहे, जे आपल्या धार्मिक आणि साधनात्मक आचरणात संतुलन ठेवू इच्छितात. प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, “जर कोणी लसूण आणि कांदा खाल्ला असेल तरी तो देवी दुर्गाची सेवा करू शकतो, परंतु देवीला अर्पण केलेल्या नैवेद्यात लसूण आणि कांदा वापरलेला नसावा.”



आधी ‘राधा-राधा’ जप करा आणि मग कांदा खा


भक्तांनी विचारले की, “जेव्हा शाळेतील मुले भेटीसाठी बाहेर जातात, तेव्हा त्यांना कांदा-लसूणाचं जेवण मिळतं. आम्हालाही तिथे जाण्याची इच्छा असते, पण बाहेरून जेवण मिळत नाही. अशा परिस्थितीत काय करावे?” यावर प्रेमानंद महाराजांनी उत्तर दिले, “उपाशी राहू नका. आधी ‘राधा-राधा’ जप करा आणि मग कांदा खा. कांदा देखील थोडे प्रेम निर्माण करतो. संतांनी कांदा निषिद्ध केले कारण त्याचे सेवन तमोगुण वाढवते, आणि भजन करताना सत्वगुण आवश्यक असतात. त्यामुळे कांदा खाणे पापकर्म नाही.” महाराजांनी उदाहरण देत पुढे सांगितले की, “सैन्यात, व्यवसायात किंवा अभ्यासात असलेल्यांना सूट आहे. साधू, महात्मा आणि ईश्वराच्या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना कांदा आणि लसूण खाण्यास मनाई आहे. जरी हे दारू, मासे किंवा मांसासारखे पाप मानले जात नसले तरी, ते मूळतः तामसिक आहेत आणि भक्ती पद्धतींच्या विरुद्ध भावना निर्माण करतात. म्हणून, ते निषिद्ध मानले जातात” असंही महाराजांनी म्हटलं आहे.



कांदा-लसूणवरून भांडण टाळा


प्रेमानंद महाराजांनी भक्तांना मार्गदर्शन केले की, “ज्यांची इच्छा असेल त्यांनी कांदा-लसूण खावे. कौटुंबिक जीवनात अनेकदा कुटुंबातील सदस्य कांदा आणि लसूण खातात, त्यामुळे भक्तीच्या नावाखाली भांडणे करणे योग्य नाही. भांडायची गरज असेल तर स्वयंपाकघरात सर्वांसाठी एकसारखे पदार्थ बनवण्याची विनंती करा. तसेच, कोणाला देवाला नैवेद्य दाखवताना कांदा-लसूण नको वाटत असेल, तर त्यांच्यासाठी वेगळे जेवण बनवू शकता.”



दीक्षा घेतल्यावर कांदा-लसूण खाण्यावर नियम कडक


अशातच दीक्षा घेतल्यानंतर काय नियम पाळावे लागतात याबद्दलही प्रेमानंद महाराजांनी म्हटलंय की, “दीक्षा घेतल्यानंतर कांदा आणि लसूण खाण्यावर अधिक कडक नियम लागू होतो. या काळात भक्तांनी हरीची भक्ती करण्याची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी कांदा-लसूण खाणे टाळावे. मात्र, ज्यांना मुले आहेत किंवा ज्यांची नोकरीसाठी आवश्यक असते, त्यांच्यासाठी परिस्थितीनुसार विवेकपूर्ण खाणे पाप मानले जात नाही. दीक्षा घेतलेल्या भक्तांनी राधा-राधेचा जप करत नियम पाळावे.”

Comments
Add Comment

Jharkhand : झारखंडमध्ये झामुमो - काँग्रेस सरकारचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

रांची : विद्यार्थ्यांशी चर्चा करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे टाळा असे आवाहन एक्स पोस्ट करून संसदेतील विरोधी

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Crime News : राज्यातले आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट उद्ध्वस्त, DRI ची कारवाई

मुंबई : मादक द्रव्ये आणि मनोविकारकारक पदार्थांच्या अवैध उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात आपली