तुम्ही UPI वापरता का? तर ही तुमच्यासाठी आहे महत्त्वाची माहिती...

मुंबई : भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठा बदल घडवणारी घोषणा समोर आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) वर ईएमआयचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. आतापर्यंत यूपीआय हे फक्त एका साध्या पेमेंटचे माध्यम मानले जात होते, परंतु या नव्या सुविधेमुळे यूपीआय एक संपूर्ण क्रेडिट इकोसिस्टममध्ये रूपांतरित होणार आहे. ग्राहकांना कुठलेही पेमेंट करताना ते त्वरित ईएमआयमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय मिळणार असून, त्यामुळे डिजिटल व्यवहार अधिक लवचिक आणि सोयीस्कर होतील.


एनपीसीआयच्या माहितीनुसार, नवीन व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर जेव्हा ग्राहक कुठल्याही दुकानात किंवा सेवेसाठी क्यूआर कोड स्कॅन करतील, तेव्हा त्यांच्या स्क्रीनवर त्वरित ईएमआयचा पर्याय दिसेल. हे अगदी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाइप करून पेमेंट केल्यानंतर ईएमआय निवडण्याच्या प्रक्रियेप्रमाणे असेल. नियमावली तयार झाल्यामुळे ही सुविधा लवकरच देशभरात मोठ्या प्रमाणावर अंमलात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


या बदलामुळे फिनटेक कंपन्या आणि बँकांना देखील नवीन महसुली संधी मिळणार आहेत. नवी आणि पेटीएमसारख्या कंपन्या आधीपासूनच बँकांच्या भागीदारीतून ग्राहकांना क्रेडिट लाईन ऑफर करत आहेत. आता ईएमआयची सुविधा सुरू झाल्यानंतर त्यांचे व्यवसाय मॉडेल आणखी मजबूत होईल. यूपीआय आणि रूपे डेबिट कार्ड व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही, परंतु क्रेडिट पेमेंटवर सुमारे १.५ टक्के इंटरचेंज फी आकारली जाणार आहे. त्यामुळे फिनटेक कंपन्यांसाठी कमाईचा नवीन मार्ग खुला होईल.


उद्योगातील जाणकारांचे मत आहे की या सुविधेमुळे डिजिटल पेमेंटचा चेहराच बदलून जाईल. पेययूचे सीईओ अनिर्बान मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे की, यूपीआय आता केवळ पेमेंटचे साधन राहणार नाही, तर एक संपूर्ण पेमेंट प्रणालीमध्ये विकसित होईल. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही, त्यांनाही आता चेकआउट फायनान्सिंगसारखा लाभ मिळेल. लहान कर्जे, ‘बाय-नाऊ-पे-लेटर’ सारखी मॉडेल्स आणि मायक्रो फायनान्सिंग यूपीआयच्या माध्यमातून आणखी लोकप्रिय होतील.


तथापि, बँकिंग क्षेत्राने सावधगिरीचा इशारा दिला आहे. छोट्या कर्जांमध्ये बुडीत कर्जाचा धोका कायम असल्याने या मॉडेलची अंमलबजावणी करताना बँकांना विचारपूर्वक पावले उचलावी लागतील. सध्या यूपीआयवर दरमहा जवळपास २० अब्ज व्यवहार होत असून, २५ ते ३० कोटी युजर्स आहेत. या प्रचंड नेटवर्कवर ईएमआयचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर व्यवहारांची ताकद आणि पोहोच अनेक पटींनी वाढेल, यात शंका नाही.


डिजिटल पेमेंटमधील ही नवी सुविधा केवळ ग्राहकांसाठी सोयीची ठरणार नाही, तर भारतातील फिनटेक क्षेत्रासाठीही नवी क्रांती घडवेल. त्यामुळे येत्या काळात यूपीआयच्या माध्यमातून केवळ पेमेंटच नाही, तर आर्थिक नियोजनाचाही एक नवा अध्याय सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

Aadhaar App : आधार ॲपने ओलांडला ४ कोटी डाउनलोड्सचा टप्पा

नवी दिल्ली : आधार ॲपने 4 कोटी डाउनलोड्सचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. यातून नागरिकांचा सोयीस्कर आणि डिजिटल

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' शब्दावर आक्षेप, अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

नवी दिल्ली : रेल्वे अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत

Krishna Temple : श्रीकृष्ण चरणी भक्ताने अर्पण केली २० लाखांची सोन्याची बासरी

राजस्थान : राजस्थानात चित्तोडगड जिल्ह्यातील मेवाडचे प्रसिद्ध श्री सावळिया सेठ मंदिरात जयपूर येथील एका भाविक

Ahmedabad : अहमदाबादमधील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू

Ahmedabad : अहमदाबाद मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील महमूदपुरा (Mahmudpura)

Supreme Court : 'मादर***' आणि 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील नाहीत? सर्वोच्च न्यायालयाचा अजब दावा

नवी दिल्ली : शिवीगाळ आणि अश्लीलतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मोठा निर्णय

Infiltration Bid Foiled In J&K : LoC वर पुन्हा तणाव! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच गोळीबार; राजौरीमधील पाकिस्तानाचा घुसखोरीचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडला

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (LoC) पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली