तुम्ही UPI वापरता का? तर ही तुमच्यासाठी आहे महत्त्वाची माहिती...

मुंबई : भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठा बदल घडवणारी घोषणा समोर आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) वर ईएमआयचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. आतापर्यंत यूपीआय हे फक्त एका साध्या पेमेंटचे माध्यम मानले जात होते, परंतु या नव्या सुविधेमुळे यूपीआय एक संपूर्ण क्रेडिट इकोसिस्टममध्ये रूपांतरित होणार आहे. ग्राहकांना कुठलेही पेमेंट करताना ते त्वरित ईएमआयमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय मिळणार असून, त्यामुळे डिजिटल व्यवहार अधिक लवचिक आणि सोयीस्कर होतील.


एनपीसीआयच्या माहितीनुसार, नवीन व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर जेव्हा ग्राहक कुठल्याही दुकानात किंवा सेवेसाठी क्यूआर कोड स्कॅन करतील, तेव्हा त्यांच्या स्क्रीनवर त्वरित ईएमआयचा पर्याय दिसेल. हे अगदी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाइप करून पेमेंट केल्यानंतर ईएमआय निवडण्याच्या प्रक्रियेप्रमाणे असेल. नियमावली तयार झाल्यामुळे ही सुविधा लवकरच देशभरात मोठ्या प्रमाणावर अंमलात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


या बदलामुळे फिनटेक कंपन्या आणि बँकांना देखील नवीन महसुली संधी मिळणार आहेत. नवी आणि पेटीएमसारख्या कंपन्या आधीपासूनच बँकांच्या भागीदारीतून ग्राहकांना क्रेडिट लाईन ऑफर करत आहेत. आता ईएमआयची सुविधा सुरू झाल्यानंतर त्यांचे व्यवसाय मॉडेल आणखी मजबूत होईल. यूपीआय आणि रूपे डेबिट कार्ड व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही, परंतु क्रेडिट पेमेंटवर सुमारे १.५ टक्के इंटरचेंज फी आकारली जाणार आहे. त्यामुळे फिनटेक कंपन्यांसाठी कमाईचा नवीन मार्ग खुला होईल.


उद्योगातील जाणकारांचे मत आहे की या सुविधेमुळे डिजिटल पेमेंटचा चेहराच बदलून जाईल. पेययूचे सीईओ अनिर्बान मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे की, यूपीआय आता केवळ पेमेंटचे साधन राहणार नाही, तर एक संपूर्ण पेमेंट प्रणालीमध्ये विकसित होईल. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही, त्यांनाही आता चेकआउट फायनान्सिंगसारखा लाभ मिळेल. लहान कर्जे, ‘बाय-नाऊ-पे-लेटर’ सारखी मॉडेल्स आणि मायक्रो फायनान्सिंग यूपीआयच्या माध्यमातून आणखी लोकप्रिय होतील.


तथापि, बँकिंग क्षेत्राने सावधगिरीचा इशारा दिला आहे. छोट्या कर्जांमध्ये बुडीत कर्जाचा धोका कायम असल्याने या मॉडेलची अंमलबजावणी करताना बँकांना विचारपूर्वक पावले उचलावी लागतील. सध्या यूपीआयवर दरमहा जवळपास २० अब्ज व्यवहार होत असून, २५ ते ३० कोटी युजर्स आहेत. या प्रचंड नेटवर्कवर ईएमआयचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर व्यवहारांची ताकद आणि पोहोच अनेक पटींनी वाढेल, यात शंका नाही.


डिजिटल पेमेंटमधील ही नवी सुविधा केवळ ग्राहकांसाठी सोयीची ठरणार नाही, तर भारतातील फिनटेक क्षेत्रासाठीही नवी क्रांती घडवेल. त्यामुळे येत्या काळात यूपीआयच्या माध्यमातून केवळ पेमेंटच नाही, तर आर्थिक नियोजनाचाही एक नवा अध्याय सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

West Bengal Earthquake : पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; सिलीगुडी, कूचबिहार हादरले, रिक्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद

कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये रविवारी रात्री भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले. सिलीगुडी (Siliguri) आणि कूचबिहार (Cooch

Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या

NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार असलेल्या नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर

CRIME : नवांशहर हादरले! बेपत्ता राधिकाची निर्घृण हत्या; ब्रीफकेसमध्ये मृतदेह भरून जंगलात जाळला

NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर

Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने

हजारांच्या पगारापासून कोट्यवधींची संपत्ती? ओडिशातील अभियंत्याच्या ठिकाणी छापे, २ कोटींची रोकड जप्त

ओडिशामध्ये (odisha) भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) एका सरकारी