तुम्ही UPI वापरता का? तर ही तुमच्यासाठी आहे महत्त्वाची माहिती...

मुंबई : भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठा बदल घडवणारी घोषणा समोर आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआई) आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) वर ईएमआयचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. आतापर्यंत यूपीआय हे फक्त एका साध्या पेमेंटचे माध्यम मानले जात होते, परंतु या नव्या सुविधेमुळे यूपीआय एक संपूर्ण क्रेडिट इकोसिस्टममध्ये रूपांतरित होणार आहे. ग्राहकांना कुठलेही पेमेंट करताना ते त्वरित ईएमआयमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय मिळणार असून, त्यामुळे डिजिटल व्यवहार अधिक लवचिक आणि सोयीस्कर होतील.


एनपीसीआयच्या माहितीनुसार, नवीन व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर जेव्हा ग्राहक कुठल्याही दुकानात किंवा सेवेसाठी क्यूआर कोड स्कॅन करतील, तेव्हा त्यांच्या स्क्रीनवर त्वरित ईएमआयचा पर्याय दिसेल. हे अगदी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाइप करून पेमेंट केल्यानंतर ईएमआय निवडण्याच्या प्रक्रियेप्रमाणे असेल. नियमावली तयार झाल्यामुळे ही सुविधा लवकरच देशभरात मोठ्या प्रमाणावर अंमलात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


या बदलामुळे फिनटेक कंपन्या आणि बँकांना देखील नवीन महसुली संधी मिळणार आहेत. नवी आणि पेटीएमसारख्या कंपन्या आधीपासूनच बँकांच्या भागीदारीतून ग्राहकांना क्रेडिट लाईन ऑफर करत आहेत. आता ईएमआयची सुविधा सुरू झाल्यानंतर त्यांचे व्यवसाय मॉडेल आणखी मजबूत होईल. यूपीआय आणि रूपे डेबिट कार्ड व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही, परंतु क्रेडिट पेमेंटवर सुमारे १.५ टक्के इंटरचेंज फी आकारली जाणार आहे. त्यामुळे फिनटेक कंपन्यांसाठी कमाईचा नवीन मार्ग खुला होईल.


उद्योगातील जाणकारांचे मत आहे की या सुविधेमुळे डिजिटल पेमेंटचा चेहराच बदलून जाईल. पेययूचे सीईओ अनिर्बान मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे की, यूपीआय आता केवळ पेमेंटचे साधन राहणार नाही, तर एक संपूर्ण पेमेंट प्रणालीमध्ये विकसित होईल. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड नाही, त्यांनाही आता चेकआउट फायनान्सिंगसारखा लाभ मिळेल. लहान कर्जे, ‘बाय-नाऊ-पे-लेटर’ सारखी मॉडेल्स आणि मायक्रो फायनान्सिंग यूपीआयच्या माध्यमातून आणखी लोकप्रिय होतील.


तथापि, बँकिंग क्षेत्राने सावधगिरीचा इशारा दिला आहे. छोट्या कर्जांमध्ये बुडीत कर्जाचा धोका कायम असल्याने या मॉडेलची अंमलबजावणी करताना बँकांना विचारपूर्वक पावले उचलावी लागतील. सध्या यूपीआयवर दरमहा जवळपास २० अब्ज व्यवहार होत असून, २५ ते ३० कोटी युजर्स आहेत. या प्रचंड नेटवर्कवर ईएमआयचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर व्यवहारांची ताकद आणि पोहोच अनेक पटींनी वाढेल, यात शंका नाही.


डिजिटल पेमेंटमधील ही नवी सुविधा केवळ ग्राहकांसाठी सोयीची ठरणार नाही, तर भारतातील फिनटेक क्षेत्रासाठीही नवी क्रांती घडवेल. त्यामुळे येत्या काळात यूपीआयच्या माध्यमातून केवळ पेमेंटच नाही, तर आर्थिक नियोजनाचाही एक नवा अध्याय सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Ahmedabad Bullet Train : प्रतीक्षा संपली! देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'ची पहिली झलक आली समोर; दिल्लीत झळकावले चित्र

नवी दिल्ली : भारतातील बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

Dubare Elephant Camp : थरकाप उडवणारी घटना! कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये दोन हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'दुबारे एलिफंट कॅम्प' (Dubare Elephant Camp) मध्ये एक अत्यंत

Yogi Adityanath : ‘नमाज पठण करायचे असेल तर शिफ्टमध्ये करा, प्रेमाने ऐकाल तर ठीक, नाहीतर...’; योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

उत्तर प्रदेश : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh Minister) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)

India - Sweden Bilateral Talks : पंतप्रधान मोदींची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन

Uttar Pradesh Road Accident : उत्तर प्रदेशामध्ये ट्रक-मॅजिकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू

लखनौ : येथील लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात १० जणांचा