आज रूपया एक महिन्याच्या निचांकी पातळीवर मोठ्या प्रमाणात रूपया घसरला 'या' कारणांमुळे

प्रतिनिधी:युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात झाल्यानंतर युएस अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला आहे. तसेच पुन्हा एकदा डॉलर निर्देशांकात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने व एकूणच युएस प्रशासनाने एच१बी वन व्हिसा भरमसाठ प्रमा णात वाढल्याने त्याचा एकत्रित परिणाम भारतीय रुपयाच्या मूल्यांकनावर झाला आहे. त्यामुळे आज सकाळच्या सत्रातच रूपयांची पातळी एक महिन्याच्या सर्वात निचांकी पातळीवर (All time Low) वर पोहोचली आहे. सकाळी रूपया ८८.४६ रूपये प्रति युएस डॉ लर पातळीवर गेला आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात (Forex) मध्ये रुपया ८८.४१ वर व्यवहार करण्यास सुरुवात केली परंतु आणखी घसरून तो अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८८.५३ या इंट्राडे नीचांकी पातळीवरही पोहोचला आहे जो त्याच्या मागील बंद पेक्षाही २५ पैशांनी घसरला होता.


यापूर्वीच अमेरिकेकडून भारताची आर्थिक कोंडी सुरु आहे. अमेरिकेने भारताकडून आयाती वस्तूंवर अतिरिक्त ५०% टॅरिफ आकारण्यास सुरुवात केली होती. आता एच१बी व्हिसावर १ लाख डॉलर आकारण्यास सुरूवात केल्याने विशेषतः हेवी वेट आयटी कंप न्या आर्थिक संकटात सापडत आहेत. त्यांनी भारताची आर्थिक कोंडी केल्याने आता कर्मचाऱ्यांची युएस बाजारातील उपस्थिती कमी होणार असल्याने रूपयांची आवकही कमी होणार आहे. ज्याचा थेट परिणाम विदेशी चलनाच्या तुटीवर होणार असून रूपयांचे आ णखी अवमूल्यन (Devaluation) होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आजही रूपयांवर इतर विदेशी चलनाच्या बास्केट मधील तुलनेत दबाव पातळी निर्माण झाली.


आतापर्यंत चलनीय परिपेक्षात विचार केल्यास या वर्षात आतापर्यंत इतर आशियाई चलनांच्या तुलनेत रुपयाची कामगिरी कमी झाली आहे. डॉलर निर्देशांकात अलीकडच्या घसरणीचा फायदा त्यांना या नव्या घडामोडीमुळे गमवावा लागला आहे. भारतीय निर्याती वरील अमेरिकेच्या तीव्र शुल्कामुळे व्यापाराच्या शक्यतांना धक्का बसला आहे आणि परकीय भांडवलाचा प्रवाह कमी झाला आहे, ज्यामुळे चलनावर दबाव आला आहे. केवळ आर्थिक वर्ष २०२५ मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून १५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली होती.तज्ञांच्या मते,भारतीय रिझर्व्ह बँकेकडे रुपया अवमूल्यनचा वेग मंदावण्याची परवानगी आहे .आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये चलनवाढ ४-४.५% च्या मर्यादेत राहण्याचा अंदाज असल्याने, थोडीशी कमकुवतता आटोक्या त आणता येईल.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा, राज्यात कुठे होणार युती आणि कुठे मैत्रीपूर्ण लढती ?

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

भाजपचा शरद पवार गटाला मोठा धक्का

धुळे : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही