मंत्री नितेश राणेंनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट : कोकणवासीयांच्या अनेक मागण्या मांडल्या सविस्तर

वैभववाडी - कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची ही केली मागणी


रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद;सहकार्य व तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन


दिल्ली : माननीय मंत्री नितेशजी राणे यांनी आज दिल्लीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकणातील रेल्वे समस्यांबाबत चर्चा करून काही मागण्या मांडल्या.रेल्वेमंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य व कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.


मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्र्यांशी कोकण विभागातील महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांवर चर्चा करताना उदभवनाऱ्या समस्या मांडल्या.सिंधुदुर्ग व परिसरातील महत्वाच्या स्थानकांवर १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे,कोइंबतूर, नागरकोईल व मडगाव एक्सप्रेसना कणकवली येथे थांबा,मांडवी एक्स्प्रेसला नांदगाव स्थानकावर थांबा मिळावा, मडूरे व सावंतवाडी येथून विशेष गाड्या,पीआरएस काऊंटर,प्रवासी सुविधा उन्नतीकरण,तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ,स्थानकाचे आधुनिकीकरण तसेच वैभववाडी - कोल्हापूर या नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी यासारख्या अनेक मागण्या रेल्वेमंत्र्यांकडे केल्या.


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्री नितेश राणे यांच्या या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक ते सहकार्य व यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.मंत्री नितेश राणेंनी घेतलेल्या या भेटीमुळे कोकणवासीयांच्या गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या मागण्या आता लवकरच पूर्ण होताना दिसणार आहेत.

Comments
Add Comment

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी