ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन-डेत स्लो ओव्हर रेटसाठी भारतीय महिला संघाला दंड

दुबई : अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल भारताला मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. बेथ मुनी आणि स्मृती मानधना यांनी शतके झळकावलेल्या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ४३ धावांनी पराभव केला.


आयसीसीच्या मते एमिरेट्स आयसीसी इंटरनॅशनल पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीजच्या जीएस लक्ष्मी यांनी ही शिक्षा लागू केली. आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, निर्धारित वेळेत न टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी संघाला त्याच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड ठोठावला जातो.


भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांमधील हा शेवटचा सामना होता. भारतीय संघ ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटीमध्ये श्रीलंकेविरुद्ध आपला विश्वचषकाचा प्रवास सुरू करणार आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दिवशी इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना खेळेल.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाला पराभव पत्करावा लागला तरी, मानधनाने केवळ ५० चेंडूत एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय महिला क्रिकेटपटूकडून सर्वात जलद शतक झळकावले. भारतीय फलंदाज विराट कोहलीने यापूर्वी २०१३ मध्ये जयपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५२ चेंडूत भारताकडून सर्वात जलद एकदिवसीय शतक ठोकले होते.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि