नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणाचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० सप्टेंबर रोजी लोकार्पण होईल, अशी घोषणा झाली होती. मात्र, वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे की, ३० तारखेला कोणतेही उद्घाटन होणार नाही.


या विमानतळाच्या नामकरणावरून गेले अनेक महिने राजकीय वातावरण तापलेले आहे. स्थानिक आगरी-कोळी समाज, तसेच प्रकल्पग्रस्तांनी या विमानतळाला त्यांच्या नेत्यांचे, दिवंगत दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे, अशी जोरदार मागणी केली आहे. यासाठी विविध पातळ्यांवर आंदोलनही करण्यात आले. विशेषतः शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बाईक रॅली काढून जनभावना व्यक्त केल्या होत्या.


राजकीय बैठकांमध्येही या नामकरणावरून वाद रंगले. खासदार सुरेश म्हात्रे आणि अपक्ष खासदार कपिल पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत आंदोलनाच्या मुद्द्यावरून मतभेद झाले. बाळ्या मामांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "आंदोलन केल्याशिवाय दि.बा. पाटील यांचे नाव लागू शकणार नाही." तर, कपिल पाटील यांनी संयमाची भूमिका घेतली आणि आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याची संमती दिली आहे आणि केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या विमानतळाला "दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ" असेच नाव दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विमानतळाच्या उद्घाटनाच्या आणि नामकरणाच्या या गोंधळात नेमकी तारीख आणि नाव काय राहणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूरमधील ‘ईव्हीएम स्ट्राँग रूम’ बाहेरील सीसीटीव्ही हटवल्याप्रकरणी सखोल चौकशी होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; सरकारने घेतली गंभीर दखल

नागपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या पेठ-वडगाव नगरपालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएम स्ट्राँग

वर्ध्यात 'डीआरआय'च्या टीमकडून ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नागपूर : कारंजा (वर्धा) परिसरातील दुर्गम भागात अवैधरित्या उभारण्यात आलेला ‘मेफेड्रोन’ निर्मितीचा कारखाना

थकीत ₹५००० कोटी दंड वसुलीसाठी फडणवीसांची 'कठोर' घोषणा; लवकरच नवी पॉलिसी

नागपूर : विधान परिषदेत आज टू-व्हीलर पार्किंग आणि वाहनधारकांकडून थकीत चालान वसूल करण्याच्या प्रश्नावर

येत्या आठ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी होणार

नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे

वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास

ओबीसी समाजासाठी मिनी महामंडळांची स्थापना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर :  विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण