नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणाचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० सप्टेंबर रोजी लोकार्पण होईल, अशी घोषणा झाली होती. मात्र, वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे की, ३० तारखेला कोणतेही उद्घाटन होणार नाही.


या विमानतळाच्या नामकरणावरून गेले अनेक महिने राजकीय वातावरण तापलेले आहे. स्थानिक आगरी-कोळी समाज, तसेच प्रकल्पग्रस्तांनी या विमानतळाला त्यांच्या नेत्यांचे, दिवंगत दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे, अशी जोरदार मागणी केली आहे. यासाठी विविध पातळ्यांवर आंदोलनही करण्यात आले. विशेषतः शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बाईक रॅली काढून जनभावना व्यक्त केल्या होत्या.


राजकीय बैठकांमध्येही या नामकरणावरून वाद रंगले. खासदार सुरेश म्हात्रे आणि अपक्ष खासदार कपिल पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत आंदोलनाच्या मुद्द्यावरून मतभेद झाले. बाळ्या मामांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "आंदोलन केल्याशिवाय दि.बा. पाटील यांचे नाव लागू शकणार नाही." तर, कपिल पाटील यांनी संयमाची भूमिका घेतली आणि आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याची संमती दिली आहे आणि केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या विमानतळाला "दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ" असेच नाव दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विमानतळाच्या उद्घाटनाच्या आणि नामकरणाच्या या गोंधळात नेमकी तारीख आणि नाव काय राहणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास