नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणाचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० सप्टेंबर रोजी लोकार्पण होईल, अशी घोषणा झाली होती. मात्र, वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे की, ३० तारखेला कोणतेही उद्घाटन होणार नाही.


या विमानतळाच्या नामकरणावरून गेले अनेक महिने राजकीय वातावरण तापलेले आहे. स्थानिक आगरी-कोळी समाज, तसेच प्रकल्पग्रस्तांनी या विमानतळाला त्यांच्या नेत्यांचे, दिवंगत दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जावे, अशी जोरदार मागणी केली आहे. यासाठी विविध पातळ्यांवर आंदोलनही करण्यात आले. विशेषतः शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बाईक रॅली काढून जनभावना व्यक्त केल्या होत्या.


राजकीय बैठकांमध्येही या नामकरणावरून वाद रंगले. खासदार सुरेश म्हात्रे आणि अपक्ष खासदार कपिल पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत आंदोलनाच्या मुद्द्यावरून मतभेद झाले. बाळ्या मामांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "आंदोलन केल्याशिवाय दि.बा. पाटील यांचे नाव लागू शकणार नाही." तर, कपिल पाटील यांनी संयमाची भूमिका घेतली आणि आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.बा. पाटील यांचेच नाव देण्याची संमती दिली आहे आणि केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर या विमानतळाला "दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ" असेच नाव दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विमानतळाच्या उद्घाटनाच्या आणि नामकरणाच्या या गोंधळात नेमकी तारीख आणि नाव काय राहणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या

प्रतीक्षा संपली! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार!

नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेव

‘आंदोलन कायम ठेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार’- बच्चू कडू

मुंबईला जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार नागपूर : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातल्या आरोपीने लपवलेल्या मोबाईलमध्ये मिळाला मृत्यूपूर्वीचा 'तो' फोटो...

फलटण: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही मुंबई : स्थानिक

Maharashtra Local Body Election : १० नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होणार? मोठी अपडेट आली समोर

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी माहिती