घाटकोपर बेकायदेशीर जाहिरात फलक दुर्घटना; संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाहीचे निर्देश

मुंबई : मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल शिफारशींसह स्वीकारण्यास. तसेच समितीचे निष्कर्ष, व सुचविलेल्या उपाययोजनांवर करावयाच्या अंलबजावणीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावर संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.


घाटकोपर येथे १३ मे २०२४ रोजी वारा व मुसळधार पावसामुळे प्रचंड आकाराचा जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला होता. या दुर्घटनेत १७ नागरिकांचा मृत्यू आणि ८० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी राज्य शासनाने माजी न्यायमुर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने मुख्यमंत्री महोदयांकडे यापुर्वीच अहवाल सादर केला होता.


न्या. भोसले यांच्या अहवालातील निष्कर्ष व समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवर पडताळणी करण्यासाठी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने आज मंत्रिमंडळासमोर विविध विभागांनी करावयाच्या अंमलबजावणीचा कृती अहवाल सादर केला. त्यानुसार या अहवालातील शिफारशीवर आता संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करावी लागणार आहे.


यात समितीने अशा फलकांच्या नियमित तपासणी करण्याबरोबरच, कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी याबाबतही सूचना केल्या आहेत. मार्गदर्शक तत्वे म्हणून २१ मुद्यांची शिफारस केली आहे. अनधिकृत फलकांवरील कारवाईसाठी नोडल यंत्रणा नियुक्त करणे. कारवाईसाठी महापालिका यंत्रणांना संपूर्ण अधिकार असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय अशा फलकांचा आकार जास्तीत जास्त ४० फूट बाय ४० फूट असावा. ते टेरेसववर किंवा कंपाऊड वॉलवर लावू नयेत अशा शिफारशी केल्या आहेत. स्थानसापेक्ष धोके, वाहतूक सुरक्षितता, पादचाऱ्यांची, विशेषतः दिव्यांगाची सुरक्षितता व सोय, रचना, परिसर व पर्यावरण या अनुषंगानेही सविस्तर शिफारशी केल्या आहेत.

Comments
Add Comment

२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; जाणून घ्या कोणत्या दिवशी राहणार सरकारी कार्यालये बंद?

मुंबई : काहीच दिवसांत २०२५ वर्ष निरोप घेईल आणि नवीन वर्षाची सुरुवात होईल. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२६

मुंबईतील १६ भूखंडांचा ई लिलाव होणार

शाळा, रुग्णालय आणि इतर सुविधांसाठी राखीव भूखंडांचा समावेश मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकतीच मुंबईतील

अपात्र गिरणी कामगारांनाही म्हाडाची घरे मिळणार!

कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत मुंबई : कागदपत्रांमधील त्रुटीमुळे म्हाडाचे घर

Mumbai Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! मेगाब्लॉकमुळे मुंबई लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल; तुमच्या प्रवासाचे नियोजन बदला!

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

वायू प्रदूषण हे मुंबईतील सर्वांत गंभीर नागरी आव्हानांपैकी एक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'वायू प्रदूषण हे मुंबईसमोर उभ्या असलेल्या सर्वात गंभीर नागरी आव्हानांपैकी एक आहे.

मालाड रामबागमधील अनेक वर्षांपासूनचा अंधार झाला दूर

रस्त्याच्या विकासासह पिण्याचे पाणी, तुंबणाऱ्या पाण्याचीही मिटली समस्या स्थानिक नगरसेविका योगिता कोळी यांच्या