Dattary Bharne : पिकं बुडाली तरी आशेचा किरण; कृषीमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!

मुंबई : राज्यातील जोरदार पावसाने अनेक भागात हाहाकार उडवला आहे. काही गावांमध्ये पुराचे पाणी घरात शिरले असून, नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी कंबरेपर्यंत पोहचले आहे. यामुळे शेतजमीन आणि पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे, तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली आहे. राज्यातील ७० लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यावर योग्य तो भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. आज कॅबिनेटची बैठक होण्यापूर्वी, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधत ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर मिळेल आणि पिकांचे व्यवस्थापन पुढे चालू राहू शकेल, असा आश्वासक संदेश त्यांनी दिला.



७० लाख एकर पिकांचे मोठे नुकसान, पशुधनही प्रभावित


विदर्भात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीनंतर मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहेत, कारण जवळजवळ ७० लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. विशेषतः नदीकाठ आणि ओढ्याकाठची शेती या अतिवृष्टीमुळे बळी पडली असून, जमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान भयंकर आहे, तसेच पशुधनावरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक गावात पाणी शिरल्यामुळे घरांमध्ये पडझड झाली आहे. या सर्व परिस्थितीवर तातडीने लक्ष ठेवून, कृषीमंत्री भरणे यांनी संबंधित अधिकार्‍यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.




अतिवृष्टीनंतर पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर


राज्यातील प्रचंड पावसामुळे शेतीसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, राज्यात पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी पंचनामे पूर्ण झाली आहेत, तर काही ठिकाणी लगेच सुरू करण्याची प्रक्रिया आहे. हे निसर्गाचं संकट असून, सर्वांनी धीर धरावा लागणार आहे. सरकार या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. ज्यांचे पंचनामे पूर्ण झाली आहेत, त्यांना नुकसानभरपाई दिली गेली आहे. तर ज्यांचे पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत, त्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई मिळेल, अशी घोषणा त्यांनी केली. कृषीमंत्री यांनी हे देखील सांगितले की, प्रत्येक ठिकाणी नुकसानाचा अंदाज घेऊन त्वरित पंचनाम्याची प्रक्रिया सुनिश्चित केली जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल.



निकष असले तरी मदतीसाठी सरकार सज्ज


राज्यातील अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना केंद्र आणि राज्य सरकारचे निकष निश्चित केले जातील. मात्र कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी अडचणीत असल्याने आता मदतीवर अधिक भर दिला जाईल. “हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे,” असे त्यांनी सांगितले. निकष असले तरीही, आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त मदतीचा प्रस्ताव मांडला जाईल, आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेनंतर सकारात्मक तोडगा नक्की निघेल, असा विश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल, आणि अतिवृष्टीतून झालेले नुकसान कमी करण्यास मदत होईल, असेही कृषीमंत्री यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Nashik : पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी दोस्ती फाउंडेशनचा मदतीचा हाथ, भव्य अन्नदान व प्रसाद वाटप

Nashik : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानत दोस्ती फाउंडेशन

Rajvardhini Chavan: वयाच्या अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांत ऐतिहासिक पराक्रम; बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी चव्हाणने सर केले तब्बल १०० गड-कोट

पुणे: सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे आणि ४ महिन्यांच्या बालवयात एका

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Barshi Crime : माता न तू वैरिणी! १० महिन्यांच्या चिमुकलीची आईकडून हत्या

बार्शीत थरकाप उडवणारी घटना, आईने चिमुकलीची गळा आवळून केली हत्या   सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी

Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव

Beed Pakistani Connection : बीडमधील बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; एटीएसची धडक कारवाई

बीड : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Maharashtra ATS) केलेल्या धडक तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील