आजपासून आदिमायेचा जागर, बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी


मुंबई : आज घटस्थापना. घट बसले. पूजा झाली. सोमवारी संध्याकाळी गरबा आणि दांडिया नाईटनं सार्वजनिक मंडळांमध्ये नवरात्रौत्सवाची औपचारिक सुरुवात होणार आहे. आदल्या दिवशी रविवारची सुटी आल्यामुळे नवरात्री निमित्त खरेदी करणाऱ्यांची ठिकठिकाणच्या बाजारांमध्ये गर्दी झाली होती. सार्वजनिक मंडळांनी रविवारी तयारीवर अखेरचा हात फिरवला. अनेक ठिकाणी पावसानं विश्रांती घेतल्यामुळे रविवारी संध्याकाळीच अनेक सार्वजनिक मंडळांनी देवीची मूर्ती वाजतगाजत मंडपांमध्ये आणली आहे.


नवरात्रीच्या काळामध्ये अनेक घरांमध्ये घटही बसतात. याच्या तयारीसाठी स्थानिक बाजारांमध्ये रविवारी घटांसह माती, नवरात्रीमध्ये पेरली जाणारी धान्ये विक्रीसाठी उपलब्ध होती. या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी उसळली होती. फुल बाजारात झेंडू १५० रुपयांपासून पुढे आणि शेवंती १०० रुपयांपासून पुढे दर्जानुसार उपलब्ध आहे.


मुंबादेवी मंदिरात पहाटे साडेपाचपासूनच दर्शनासाठी रांगा दिसत होत्या. मंदिरात सकाळी घटस्थापना झाली. मुंबईतील विविध मंडळांमध्ये आजपासून दुर्गेची आराधना सुरू झाली आहे. नवरात्रौत्सवाच्या निमित्नाने आता पुढचे १० दिवस गरबा, दांडिया, भोंडल्याच्या गाण्यांवर मुंबईकर फेर धरताना दिसतील.


सोमवारसाठी मुंबई, ठाणे, पालघर तसेच रायगड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मंगळवार ते गुरुवार दरम्यान मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. गुरुवारी रायगड आणि रत्नागिरीमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील