अतिवृष्टीमुळे संगोबा गावातील शेतीचे मोठे नुकसान – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पाहणी दौरा

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगोबा गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात जाऊन नुकसानग्रस्त झाली असून, यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली की, सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून, पूर्वीच्या पुरस्थितीचा विचार करता योग्य नुकसानभरपाई दिली जावी.


या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज संगोबा गावाला भेट देत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि अधिकाऱ्यांकडून नुकसानाची संपूर्ण माहिती घेतली.


स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण वाढल्यास परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री कदम यांनी यंत्रणेला तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. जीवितहानी टाळण्यासाठी ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देशही दिले.


यावेळी गृहराज्यमंत्री कदम यांनी प्रशासनाला स्पष्टपणे सांगितले की, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करावेत आणि त्यानुसार अहवाल शासनाकडे सादर करावा, जेणेकरून नुकसानभरपाई लवकर मिळू शकेल. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता बचावकार्य, वैद्यकीय सेवा आणि तात्पुरते निवास यासाठी स्वतंत्र पथक तयार ठेवण्याचेही आदेश त्यांनी दिले.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य