समुद्रात अडकलेल्या लोकांना आता रोबोट वाचवणार!

समुद्रकिनाऱ्यावरील आपत्कालीन परिस्थितीसाठी बीएमसी ६ रोबोटिक बोटी खरेदी करणार 


मुंबई: मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर भरतीदरम्यान अनेक आपत्कालीन परिस्थिती उद्भवत असते, आणि त्यासाठी बीएमसीची वॉटर रेस्क्यू टीम ही नेहमी तैनात असतात. मात्र आता, आधुनिक तंत्रज्ञान आणि AI चा जमाना असल्याकारणामुळे, मुंबई महानगरपालिकेत देखील लवकरच रोबोट काम करताना दिसून येणार आहे. जे मुंबई समुद्रात किंवा किनाऱ्यावर आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या लोकांचे जीव वाचवतील.


यासाठी, बीएमसी प्रशासनाने रोबोटिक वॉटर रेस्क्यू सिस्टम स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, ६ रोबोटिक बोटी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



रोबोट खरेदीसाठी नवीन निविदा जारी


या उपक्रमासाठी पूर्वीचा निविदा रद्द करून नवीन निविदा जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये मेक-इन-इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय कंपनीकडून हे रोबोटिक सिस्टम खरेदी केल्या जातील. या पूर्वीच्या निविदेत भारतीय पुरवठादार तुर्कीच्या मारेन रोबोटिक्सकडून सागरी सुरक्षेसाठी सहा रोबोटिक बोटी खरेदी करण्याचा समावेश होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही निविदा काढण्यात आली होती. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षदरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कीयेला धक्का देत बीएमसी प्रशासनाने पूर्वी जारी केलेले निविदा रद्द केले. त्यामुळे, नव्या निविदानुसार भारतीय कंपनीकडूनच बीएसमी रोबोटिक बोटीची खरेदी करणार आहेत. या बोटी मुंबई अग्निशमन दलाला सागरी बचाव कार्यासाठी मदत करतील.  या बोटी गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, गोराई आणि अक्सा समुद्रकिनाऱ्यांवर तैनात केल्या जातील. एका बोटीची किंमत ₹९.६२ लाख इतकी होती. प्रत्येक बोटीची क्षमता २०० किलो असेल आणि कमाल १८ किमी/तास वेग असेल. 


 
Comments
Add Comment

Additional Municipal Commissioner : एसआयआरच्या कार्यक्रमासाठी रुजू न झालेल्या बीएलओंविरोधात पोलिसांत दाखल करणार गुन्हा

महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी दिले स्पष्ट निर्देश मुंबई: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार

Agriculture Minister Dattatray Bharne : कृषी मित्र भरतीच्या नावाखालील बोगस जाहिरातींपासून सावध राहा; फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार

कृषी मित्र भरतीच्या नावाखालील फसवणुकीला बळी पडू नका; शेतकरी व युवकांना कृषी मंत्र्यांचे आवाहन मुंबई : मुंबई

Mobile Network in Metro 3 Aqua Line : अखेर तीन महिन्यांनी झाला ‘नो नेटवर्क’चा अंत! मेट्रो-3च्या ॲक्वा लाईनमध्ये मोबाईल सेवा सुरळीत सुरु

- दररोज होणार दीड लाख प्रवाशांना फायदा मुंबई : गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ भूमिगत प्रवासादरम्यान मोबाईल

Shrikant Shinde : ‘टिप नाही तर राईड नाही!’ ॲप-आधारित टॅक्सींच्या मनमानीविरोधात श्रीकांत शिंदे आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

मुंबई : ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांची होत असलेली आर्थिक लूट आणि मनमानी थांबवण्यासाठी

Ghatkopar-Mankhurd Link Road : बांगलादेशी भूमाफियांच्या 'लँड जिहाद'वर प्रहार

मानखुर्दमधील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात मुंबई : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड

Sejal Pawar Controversy Video: प्रणीत मोरेच्या शोमधील महिला डॉक्टरच्या वक्तव्यावरून वाद; मृतदेहांबद्दलचे ते विधान अंगलट; सोशल मीडियावर संताप

मुंबई: 'बिग बॉस' फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या (Pranit More) शोमधील एका व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) आता नवा वाद