समुद्रात अडकलेल्या लोकांना आता रोबोट वाचवणार!

समुद्रकिनाऱ्यावरील आपत्कालीन परिस्थितीसाठी बीएमसी ६ रोबोटिक बोटी खरेदी करणार 


मुंबई: मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर भरतीदरम्यान अनेक आपत्कालीन परिस्थिती उद्भवत असते, आणि त्यासाठी बीएमसीची वॉटर रेस्क्यू टीम ही नेहमी तैनात असतात. मात्र आता, आधुनिक तंत्रज्ञान आणि AI चा जमाना असल्याकारणामुळे, मुंबई महानगरपालिकेत देखील लवकरच रोबोट काम करताना दिसून येणार आहे. जे मुंबई समुद्रात किंवा किनाऱ्यावर आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या लोकांचे जीव वाचवतील.


यासाठी, बीएमसी प्रशासनाने रोबोटिक वॉटर रेस्क्यू सिस्टम स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, ६ रोबोटिक बोटी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



रोबोट खरेदीसाठी नवीन निविदा जारी


या उपक्रमासाठी पूर्वीचा निविदा रद्द करून नवीन निविदा जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये मेक-इन-इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय कंपनीकडून हे रोबोटिक सिस्टम खरेदी केल्या जातील. या पूर्वीच्या निविदेत भारतीय पुरवठादार तुर्कीच्या मारेन रोबोटिक्सकडून सागरी सुरक्षेसाठी सहा रोबोटिक बोटी खरेदी करण्याचा समावेश होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही निविदा काढण्यात आली होती. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षदरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर तुर्कीयेला धक्का देत बीएमसी प्रशासनाने पूर्वी जारी केलेले निविदा रद्द केले. त्यामुळे, नव्या निविदानुसार भारतीय कंपनीकडूनच बीएसमी रोबोटिक बोटीची खरेदी करणार आहेत. या बोटी मुंबई अग्निशमन दलाला सागरी बचाव कार्यासाठी मदत करतील.  या बोटी गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, गोराई आणि अक्सा समुद्रकिनाऱ्यांवर तैनात केल्या जातील. एका बोटीची किंमत ₹९.६२ लाख इतकी होती. प्रत्येक बोटीची क्षमता २०० किलो असेल आणि कमाल १८ किमी/तास वेग असेल. 


 
Comments
Add Comment

International Drug Racket Busted : ‘ऑपरेशन क्लीन मुंबई’! १७४५ कोटींचं कोकेन जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा मोठा पर्दाफाश

मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मुंबईत धडक कारवाई करत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे गेले संपूर्ण कुटुंबाचे प्राण; फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर

मुंबई : पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुंबई हादरली होती. सुरुवातीला कलिंगड

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ