'ऋषभ पंत'च्या पुनरागमनाची प्रतीक्षा वाढणार ?

मुंबई : टीम इंडियामध्ये ऋषभ पंतच्या पुनरागमनाची प्रतीक्षा वाढली आहे. डावखुरा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान पायाला फ्रॅक्चर झाला होता, ज्यामुळे तो तीन ते चार आठवडे क्रिकेटपासून दूर राहिला.


ऋषभ पंतला दहा सामने खेळता येणार नाही. यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या व्हाईट-बॉल मालिकेतील आठ सामन्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने आहेत. पंत अद्याप १००% तंदुरुस्त नाही आणि परिणामी, त्याची वेस्ट इंडिज किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता नाही.


भारत २ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पांढऱ्या चेंडूची मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि ८ नोव्हेंबर रोजी संपेल. दोन्ही मालिकांसाठी पंतची उपलब्धता अनिश्चित असल्याचे माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, त्याच्या पायाची सूज अद्याप कमी झालेली नाही. त्याला त्याचे वॉकिंग बूट काढण्यासाठीही काही वेळ हवा आहे.


कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू


वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील १० सामने आता पंतला मुकावे लागणार असल्याने, तो कधी पुनरागमन करणार हे सांगता येत नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल, तर दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल. कसोटी सामन्यांनंतर, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका होईल. एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल, तर पाच टी-२० सामन्यांची मालिका ९ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात