'ऋषभ पंत'च्या पुनरागमनाची प्रतीक्षा वाढणार ?

मुंबई : टीम इंडियामध्ये ऋषभ पंतच्या पुनरागमनाची प्रतीक्षा वाढली आहे. डावखुरा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान पायाला फ्रॅक्चर झाला होता, ज्यामुळे तो तीन ते चार आठवडे क्रिकेटपासून दूर राहिला.


ऋषभ पंतला दहा सामने खेळता येणार नाही. यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या व्हाईट-बॉल मालिकेतील आठ सामन्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने आहेत. पंत अद्याप १००% तंदुरुस्त नाही आणि परिणामी, त्याची वेस्ट इंडिज किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता नाही.


भारत २ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची पांढऱ्या चेंडूची मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि ८ नोव्हेंबर रोजी संपेल. दोन्ही मालिकांसाठी पंतची उपलब्धता अनिश्चित असल्याचे माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, त्याच्या पायाची सूज अद्याप कमी झालेली नाही. त्याला त्याचे वॉकिंग बूट काढण्यासाठीही काही वेळ हवा आहे.


कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू


वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील १० सामने आता पंतला मुकावे लागणार असल्याने, तो कधी पुनरागमन करणार हे सांगता येत नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल, तर दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल. कसोटी सामन्यांनंतर, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका होईल. एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल, तर पाच टी-२० सामन्यांची मालिका ९ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.

Comments
Add Comment

IND vs PAK: शिवम दुबेचा डबल झटका, पाकिस्तानच्या ४ विकेट तंबूत

दुबई: आशिया कप २०२५च्या सुपर ४ मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगत आहे. हा सामना दुबईच्या

भारताच्या युवा संघाचा विक्रमी विजय ऑस्ट्रेलियाचा ७ विकेट्सने पराभव

तीन एकदिवसीय मालिकेत भारताची १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत १९ वर्षांखालील संघ आणि ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील

सुपर संडे, थोड्याच वेळात सुरू होणार भारत - पाकिस्तान सामना; कोण खेळणार ?

दुबई : आशिया कप २०२५ स्पर्धेतील सुपर फोर फेरीतील भारत - पाकिस्तान हा टी २० सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता

मिथुन मन्हास बनू शकतात BCCIचे नवे अध्यक्ष, २८ सप्टेंबरला होणार निवडणूक

नवी दिल्ली: भारताचे माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची बीसीसीआयच्या (BCCI) पुढील अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता

IND vs PAK: आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगणार महामुकाबला

अबूधाबी : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील

स्मृती मानधनाने इतिहास रचला! धावांचा जबरदस्त पाऊस... पण मालिका गमावली

नवी दिल्ली: स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ५० चेंडूत शतक पूर्ण करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात