घटस्थापनेच्या दिवशी पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेशचा दौरा करणार


नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवशी अर्थात सोमवारी २२ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या दोन राज्यांचा दौरा करणार आहेत. इटानगरमध्ये ५,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि त्रिपुरात माता त्रिपुरा सुंदरी मंदिर संकुलातील अनेक विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.


अरुणाचल प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदी ३,७०० कोटी रुपयांच्या दोन जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील. मोदी १८६ मेगावॅटच्या टाटो-१ आणि २४० मेगावॅटच्या हियो जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि तवांगमध्ये एकात्मिक अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन करतील. यानंतर, पंतप्रधान मोदी त्रिपुराला भेट देतील आणि माताबारी येथील 'माता त्रिपुरा सुंदरी मंदिर संकुलातील अनेक विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.


अरुणाचल प्रदेशात, मोदी इटानगरमध्ये ३,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या दोन प्रमुख जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील. यात २४० मेगावॅटचा हियो जलविद्युत प्रकल्प आणि १८६ मेगावॅटचा टाटो-१ जलविद्युत प्रकल्प या दोन प्रकल्पांचा समावेश आहे. दोन्ही प्रकल्प अरुणाचल प्रदेशच्या सियोम उप-खोऱ्यात विकसित केले जातील. पंतप्रधान मोदी तवांगमध्ये एका अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी देखील करतील. पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्धीपत्रक काढून मोदींच्या अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या दोन राज्यांच्या दौऱ्याची माहिती दिली आहे.


Comments
Add Comment

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात