घटस्थापनेच्या दिवशी पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेशचा दौरा करणार


नवी दिल्ली : घटस्थापनेच्या दिवशी अर्थात सोमवारी २२ सप्टेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या दोन राज्यांचा दौरा करणार आहेत. इटानगरमध्ये ५,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि त्रिपुरात माता त्रिपुरा सुंदरी मंदिर संकुलातील अनेक विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.


अरुणाचल प्रदेशमध्ये पंतप्रधान मोदी ३,७०० कोटी रुपयांच्या दोन जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील. मोदी १८६ मेगावॅटच्या टाटो-१ आणि २४० मेगावॅटच्या हियो जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि तवांगमध्ये एकात्मिक अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन करतील. यानंतर, पंतप्रधान मोदी त्रिपुराला भेट देतील आणि माताबारी येथील 'माता त्रिपुरा सुंदरी मंदिर संकुलातील अनेक विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत.


अरुणाचल प्रदेशात, मोदी इटानगरमध्ये ३,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या दोन प्रमुख जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील. यात २४० मेगावॅटचा हियो जलविद्युत प्रकल्प आणि १८६ मेगावॅटचा टाटो-१ जलविद्युत प्रकल्प या दोन प्रकल्पांचा समावेश आहे. दोन्ही प्रकल्प अरुणाचल प्रदेशच्या सियोम उप-खोऱ्यात विकसित केले जातील. पंतप्रधान मोदी तवांगमध्ये एका अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी देखील करतील. पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्धीपत्रक काढून मोदींच्या अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या दोन राज्यांच्या दौऱ्याची माहिती दिली आहे.


Comments
Add Comment

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज

एअरपोर्टवर विराटच्या भेटीला जमली 'विराट' गर्दी; चाहत्यांचा घेराव... सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

गुजरात : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे ११ जानेवारीला वडोदरा येथे खेळवला जाणारा आहे. या सामन्यापूर्वीच