Gunaratna Sadavarte Attack: गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला

जालना: मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मनोज जरांगे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. गुणरत्न सदावर्ते हे रविवारी जालना येथील धनगर उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात सदावर्ते यांना काहीच दुखापत झाली नाही, केवळ त्यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.


पोलिसांनी सर्व मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले असून, यामध्ये मनोज जरांगे पाटील समर्थक विश्वंभर तिरुखे यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.


मराठा आरक्षण आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत आक्रमक भाषेत मनोज जरांगे पाटील यांचा समाचार घेतला होता. तसेच त्यांनी मुंबईतील मराठा आंदोलनालाही तीव्र विरोधच केला होता. सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांची मागणी असंवैधानिक असल्याचे म्हणत सातत्याने मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध केला होता. त्यामुळे मराठा आंदोलकांचा त्यांच्याविषयीचा रोष अनेक दिवसांपासून खदखदत होता, जी आज हल्ल्याच्या रूपात बाहेर आला.


यापूर्वी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले असताना देखील गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर टिका केली होती. त्यावेळी सदावर्ते यांच्या मुंबईतील घराबाहेर असणाऱ्या गाडीच्या काचा मराठा आंदोलकांद्वारे फोडण्यात आल्या होत्या.

Comments
Add Comment

आता नरिमन पॉईंट ते मिरा-भाईंदर केवळ अर्ध्या तासात

मुंबई: दक्षिण मुंबई आणि मुंबई उपनगरला जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसरकारने

PM Modi Address to Nation: पंतप्रधान मोदी आज करणार महत्वपूर्ण घोषणा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५.०० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यात ते अनेक महत्वपूर्ण

मुंबईत 'नमो युवा रन' चा जल्लोष!, मुख्यमंत्र्यानी हिरवा झेंडा दाखवत केली दिमाखात सुरुवात

मुंबई: भाजप आणि त्यांची युवा शाखा, भाजयुमो, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून पुढील १५ दिवस "सेवा पंधरवडा" उपक्रम

समुद्रात अडकलेल्या लोकांना आता रोबोट वाचवणार!

समुद्रकिनाऱ्यावरील आपत्कालीन परिस्थितीसाठी बीएमसी ६ रोबोटिक बोटी खरेदी करणार  मुंबई: मुंबईच्या समुद्र

मिथुन मन्हास बनू शकतात BCCIचे नवे अध्यक्ष, २८ सप्टेंबरला होणार निवडणूक

नवी दिल्ली: भारताचे माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची बीसीसीआयच्या (BCCI) पुढील अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता

IND vs PAK: आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगणार महामुकाबला

अबूधाबी : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील