परवापासून नवे जीएसटी दर लागू होणार

प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जीएसटीचे स्वप्न साकार जीएसटी काऊन्सिल बैठकीत पूर्ण झाले होते ज्यात सर्वसामान्यांना दिलासा म्हणून वस्तू व सेवा कर (GST) मोठी कपात झाली होती. त्याचाच पुढील अध्याय म्हणून निर्णयाची प्रत्यक्ष अंमल बजावणी परवा २२ सप्टेंबर पासून होणार आहे. त्यामुळे जीएसटी प्रणालीमध्ये मोठा बदल अपेक्षित आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या ५६ व्या जीएसटी परिषदेच्या शिफारशींनुसार सरकारने एक स रलीकृत दर रचना जाहीर केली आहे. ज्यामध्ये जीएसटी तर्कसंगतीकरण (GST Rationalisation) धोरण स्विकारले गेले आहे. दरम्यान अनेक कंपन्यांनी आपल्या वस्तूंत दरकपातीची अंमलबजावणी सुरू केली आहे.सोमवारपासून जीएसटी दोन-स्तरीय प्रणाली मध्ये जाईल जिथे बहुतेक वस्तू आणि सेवांवर ५% किंवा १८% कर आकारला जाईल.


सुधारित जीएसटी कपातीची प्रमुख ठळक मुद्दे-


पुनर्रचनाचा उद्देश व्यक्तींना, विशेषतः मध्यमवर्गाला दिलासा देणे, व्यवसायांसाठी अनुपालन सुलभ करणे आणि जीएसटी अंतर्गत व्यापार सुलभ असेल.


५%, १२%, १८% आणि २८% ची विद्यमान चार-स्तरीय रचना बंद केली जाईल. त्याऐवजी केवळ ५%,१८% रचना असेल.


अति-लक्झरी वस्तूंवर ४०% जीएसटीचा मोठा कर आकारला जाईल.


तंबाखू आणि संबंधित उत्पादने २८% अधिक उपकर श्रेणीत राहतील.


२०१७ मध्ये सुरू झालेला जीएसटी आतापर्यंत चार प्रमुख स्लॅबसह कार्यरत आहे, ज्यामध्ये लक्झरी आणि पाप वस्तूंवर (Sin Goods) वर भरपाई उपकर (Sub Cess) देखील समाविष्ट आहे. येणाऱ्या बदलांमुळे अप्रत्यक्ष कर चौकटीत (Framework) मध्ये त्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सर्वात महत्वाचा परिवर्तनवादी निर्णय जीएसटी २.० हा मानला जातो आहे.

Comments
Add Comment

दादरच्या स्टार मॉलला आग, अग्निशमनच्या पाच जवानांचा श्वास गुदमरला

मुंबई : दादर येथील स्टार मॉल शुक्रवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करुन ही आग आटोक्यात आणली.

शैक्षणिक संस्था, बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि क्रीडा संकुलात भटक्या कुत्र्यांना ‘नो एण्ट्री’

सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश नवी दिल्ली : शैक्षणिक संस्था, बस-रेल्वे

उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस; व्हीव्हीपॅट नाही, तर मतपत्रिका हवी!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर याचिका नागपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट

तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीचे 'एटीसी' कोलमडले! दिल्लीच्या एटीसी बिघाडाचा फटका मुंबईला!

नवी दिल्ली: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणी एअर ट्रॅफिक

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

उन्नती, प्रगती, विकासासाठी मुंबईवर महायुतीचा भगवा फडकलाच पाहिजे!

भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन मुंबई (खास प्रतिनिधी) :