MSRTC ST jobs recruitment : राज्यातील युवांसाठी सुवर्णसंधी! एसटीमध्ये मेगाभरती धमाका, १७,४५० चालक-सहायक पदे तर तब्बल 'इतका' पगार

मुंबई : भविष्यात राज्यातील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत सुमारे ८,००० नवीन बसेस सुरू करण्याच्या योजना असल्याने मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे. यासाठी एसटी महामंडळात कंत्राटी पद्धतीने १७,४५० चालक व सहाय्यक पदांसाठी भरती (ST Recruitment) राबविण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. याच भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे, ज्यामध्ये किमान वेतन ३०,००० रुपये असण्याची शक्यता आहे. भरतीसाठीची निविदा प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले की, “ही सुवर्णसंधी आहे आणि या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण-तरुणींनी घ्यावा.” राज्यातील बेरोजगारांसाठी ही भरती महत्त्वाची संधी ठरणार आहे, कारण त्यामुळे स्थिर आणि दर्जेदार रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे.



ST महामंडळात चालक व सहाय्यक भरती; ३ वर्षांसाठी कंत्राटी पद्धत


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत बससेवा सुरळीत चालू राहण्यासाठी आवश्यक चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) ३ वर्षांसाठी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, ही प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागानिहाय आयोजित केली जाईल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून आवश्यक कर्मचारी वेळेत महामंडळाला उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या उमेदवारांना सुमारे ३०,०००/- रुपये मासिक वेतन देण्यात येईल, तसेच एसटीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत सांगितले की, बसेसची वाढती संख्या लक्षात घेता, हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल. ही भरती राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराची मोठी संधी ठरणार आहे.



राज्य पोलीस भरतीला मंत्रिमंडळाची मंजुरी


काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पोलीस भरतीला अधिकृत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया लांबलेली असल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या भरती प्रक्रियेला वेग मिळणार आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ पोलीस भरतीकडे नजर ठेवून बसलेल्या अनेक तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. उमेदवार आता अपेक्षित वेगानं अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रियेची वाट पाहू शकतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पोलीस दलातील रिक्त पदे लवकरच भरली जातील, तसेच युवक-युवतींना स्थिर रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा

Ketan Agrawal Murder Case : लोणावळा हत्याकांड : आरोपी सियाच्या पालकांची कठोर भूमिका : 'दोषी असल्यास मुलीलाही त्याच दरीत ढकलून द्या'...

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या पालकांनी

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)