झिरो बॅलेन्स अकाऊंट असूनही एटीएममधून काढले पैसे

एटीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची झुंबड


जयपूर : राजस्थानच्या अलवर आणि मेवात परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून झिरो बॅलेन्स खात्यांमधूनही पैसे निघू लागल्याची माहिती आसपासच्या परिसरात पसरली. याचा फायदा घेण्यासाठी अनेकजणांनी रातोरात पोहोचून एटीएमबाहेर रांगा लावल्या. झिरो बॅलेन्स अकाऊंट असलेल्या अनेकांनी एटीएममधून पैसे काढले. याची माहिती मिळताच पोलिसांनी ५० जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी सुरू आहे.


बँक खात्यात पैसे नसले तरीही एसबीआयच्या एटीएममधून रोख काढता येत असल्याचा मेसेज १७ सप्टेंबरच्या रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाला. बँकेंच्या अनेक ग्राहकांना एसएमएसवरून ही माहिती मिळाली. यानंतर अलवर आणि आसपासच्या परिसरातील एसबीआयच्या अनेक एटीएमबाहेर गर्दी जमली. बँक प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना कळवताच त्यांनी अनेक एटीएम बंद केले. काही एटीएमच्या जवळ पोलिसांना काही संशयास्पद तरुण दिसले. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. रात्रभरात जवळपास ५० तरुणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सगळ्यांचे मोबाइल आणि वाहने जप्त केली आहेत.


प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, एसबीआयच्या संकेतस्थळावर काहीतरी तांत्रिक अडचण आली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याचा फायदा उचलला. पोलिसांनी किमान २० एटीएम बंद केले. पोलीस रात्रभर एटीएमच्या आसपास तैनात होते. या सगळ्या प्रकरणावर एसबीआयचे अधिकारी मौन बाळगून आहेत. एसबीआयकडून या सगळ्या घडामोडींबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. बँक प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तांत्रिक समस्येचा फायदा उचलण्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या