India vs Oman: टीम इंडियाने ओमानला हरवले, मात्र विकेटसाठी भारताच्या गोलंदाजांना थकवले

अबुधाबी: आशिया कप २०२५चा ग्रुप स्टेजमध्ये शेवटचा सामना आज भारत आणि ओमान यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने २१ धावांनी बाजी मारली. या सामन्यात भारताने ओमानला जिंकण्यासाठी १८९ धावांचे आव्हान दिले होते. मात्र ओमानला या सामन्यात २० षटकांत ४ बाद १६७ धावाच करता आल्या.


भारताने या सामन्यात ओमानला हरवले खरे मात्र भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी मात्र तरसवले. संपूर्ण सामन्यात भारताला केवळ ओमानच्या ४ विकेटच मिळवता आल्या. ओमानची सुरूवात जबरदस्त झाली. त्यांच्या दोन्ही फलंदाजांनी सावध सुरूवात करून दिली होती.


भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १८८ धावा केल्या होत्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शुबमन गिल अवघ्या ५ धावा काढून बाद झाला. मात्र, अभिषेक शर्माने १५ चेंडूत ३८ धावांची वेगवान खेळी करत संघाला पॉवरप्लेमध्ये दमदार सुरुवात दिली. त्यानंतर संजू सॅमसनने एक बाजू सांभाळत डाव सावरला. त्याने ४५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.


भारताला मधल्या फळीत काही धक्के बसले. हार्दिक पांड्या (१), शिवम दुबे (५) स्वस्तात बाद झाले. मात्र, अक्षर पटेलने (१३ चेंडूत २६) आणि तिलक वर्मा (१८ चेंडूत २९) यांनी आक्रमक फलंदाजी करत धावसंख्येला गती दिली. शेवटच्या षटकांमध्ये हर्षित राणाने केलेल्या १३ धावांच्या फटकेबाजीमुळे भारताला १९० च्या जवळ पोहोचता आले.


टीम इंडियाने आधीच सुपर ४मध्ये स्थान बनवले आहे आणि पाकिस्तानविरुद्ध २१ सप्टेंबरला होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्याआधी हा सामना टीम मॅनेजमेंटसाठी योग्य ठरू शकतो. तर ओमानचा संघ आधीच बाहेर झाला आहे आणि या स्पर्धेतील त्यांचा शेवटचा सामना आहे.


Comments
Add Comment

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या