मुंबईहून फुकेतला जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची धमकी

चेन्नई: मुंबईहून फुकेत, ​​थायलंडला जाणाऱ्या इंडिगोचे विमान 6E-1089 मध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे या विमानाचे शुक्रवारी रात्री उशिरा चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले. त्यानंतर सीआयएसएफ कर्मचारी आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी विमानाची तपासणी केली, मात्र त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तु तिथे सापडली नाही. त्यानंतर ही एक खोटी धमकी असल्याचे आढळून आले. मात्र तरी सुद्धा यासंबंधित अधिक चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.


वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइनने सांगितले की, दि. १९ सप्टेंबर रोजी मुंबईहून फुकेतला जाणारे इंडिगोचे विमान सुरक्षेच्या कारणांमुळे चेन्नईला वळवण्यात आले. प्रस्थापित प्रोटोकॉलनुसार अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्यात आली आणि चेन्नईमध्ये विमानाची आवश्यक सुरक्षा तपासणी करण्यात आली.


मात्र, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रवाशांची प्रचंड गैरसोय झालेली पाहायला मिळाली. प्रवाशांना चेन्नई विमानतळावर काही तस ताटकळत बसावे लागले होते. मात्र विमान प्रशासनाने ते ओळखून प्रवाशांना त्वरित अल्पोपहार सेवा आणि प्रत्येक माहिती वेळोवेळी सामायिक केली.


यापूर्वी, ६ सप्टेंबर रोजी, कोचीहून अबूधाबीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे कोचीला परत यावे लागले. प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी वैमानिकाने विमान सुरक्षितपणे उतरवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी, इंडिगोचे विमान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबूधाबीसाठी रवाना झाले. उड्डाणानंतर सुमारे दोन तासांत तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यानंतर, सुरक्षेला प्राधान्य देत, वैमानिकाने उड्डाण कोचीला परत करण्याचा निर्णय घेतला.

Comments
Add Comment

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा

नितीश कुमार यांनी २० वर्षांनी गृहमंत्री पद सोडले

१८ मंत्र्यांची खाती जाहीर पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी