मुंबईहून फुकेतला जाणाऱ्या इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची धमकी

चेन्नई: मुंबईहून फुकेत, ​​थायलंडला जाणाऱ्या इंडिगोचे विमान 6E-1089 मध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे या विमानाचे शुक्रवारी रात्री उशिरा चेन्नई विमानतळावर आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले. त्यानंतर सीआयएसएफ कर्मचारी आणि विमानतळ अधिकाऱ्यांनी विमानाची तपासणी केली, मात्र त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तु तिथे सापडली नाही. त्यानंतर ही एक खोटी धमकी असल्याचे आढळून आले. मात्र तरी सुद्धा यासंबंधित अधिक चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.


वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइनने सांगितले की, दि. १९ सप्टेंबर रोजी मुंबईहून फुकेतला जाणारे इंडिगोचे विमान सुरक्षेच्या कारणांमुळे चेन्नईला वळवण्यात आले. प्रस्थापित प्रोटोकॉलनुसार अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्यात आली आणि चेन्नईमध्ये विमानाची आवश्यक सुरक्षा तपासणी करण्यात आली.


मात्र, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रवाशांची प्रचंड गैरसोय झालेली पाहायला मिळाली. प्रवाशांना चेन्नई विमानतळावर काही तस ताटकळत बसावे लागले होते. मात्र विमान प्रशासनाने ते ओळखून प्रवाशांना त्वरित अल्पोपहार सेवा आणि प्रत्येक माहिती वेळोवेळी सामायिक केली.


यापूर्वी, ६ सप्टेंबर रोजी, कोचीहून अबूधाबीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे कोचीला परत यावे लागले. प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी वैमानिकाने विमान सुरक्षितपणे उतरवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी, इंडिगोचे विमान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबूधाबीसाठी रवाना झाले. उड्डाणानंतर सुमारे दोन तासांत तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यानंतर, सुरक्षेला प्राधान्य देत, वैमानिकाने उड्डाण कोचीला परत करण्याचा निर्णय घेतला.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला