तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही हे आधी वाचा...नाहीतर मिळणार नाहीत पैसे

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना आता e-KYC करणे बंधनकारक असणार आहे. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.


योजनेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही अपात्र व्यक्तींनी या योजनेचा गैरवापर केल्याची माहिती समोर आल्यानंतर, सरकारकडून ही पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या e-KYC मुळे चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर आळा बसणार आहे.





मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यांच्या आत ही e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर उपलब्ध आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, पात्र महिलांनी नियमित लाभ मिळवण्यासाठी ती वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. e-KYC न करणाऱ्या महिलांना भविष्यात या योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जातात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Comments
Add Comment

यंदाच्या गणेशोत्सवात लाल परीने मोडले सर्व विक्रम...केलं असं काही की...

५ हजार जादा एसटी बसमधून सहा लाख कोकणवासीयांचा प्रवास गणेशोत्सवात

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग