तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही हे आधी वाचा...नाहीतर मिळणार नाहीत पैसे

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना आता e-KYC करणे बंधनकारक असणार आहे. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.


योजनेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही अपात्र व्यक्तींनी या योजनेचा गैरवापर केल्याची माहिती समोर आल्यानंतर, सरकारकडून ही पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या e-KYC मुळे चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर आळा बसणार आहे.





मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यांच्या आत ही e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर उपलब्ध आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, पात्र महिलांनी नियमित लाभ मिळवण्यासाठी ती वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. e-KYC न करणाऱ्या महिलांना भविष्यात या योजनेचा लाभ मिळणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जातात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Comments
Add Comment

Central Railway : लोकलची 'लेटलतिफी' आता बंद! मध्य रेल्वेवर लवकरच लोकल 'सुसाट' धावणार, जबरदस्त प्लॅन नेमका काय?

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून (Central Railway Line) प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची

मुंबईतील नऊ विधानसभा क्षेत्रांमध्ये महिला राज!

पुरुषांना प्रभाग शोधण्याची आली वेळ मुंबई (सचिन धानजी)  मुंबईतील २२७ प्रभागांकरता आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर

माहिम खाडीत २ जण बुडाले! ट्रान्सजेंडर आणि तिच्या मित्राचा जीवघेणा वाद

मुंबई : माहिम खाडीजवळ घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मोबाईलवरील फोटो आणि मेसेजवरून

राज्यात पाऊस आणि थंडीचं दुहेरी संकट; हवामान खात्याकडून १२ आणि १३ नोव्हेंबरला अलर्ट

 मुंबई : नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने धडक दिल्यानंतर आता वातावरणात मोठा बदल पाहायला मिळतोय. देशभरात काही

मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील शीतल तेजवानी पुन्हा चर्चेत! बोपोडी येथे जमीन गैरव्यवहार केल्याप्रकरणी एफआरआय दाखल

मुंबई: ‘बोपोडीमधील कथित भूखंड गैरव्यवहाराशी माझा काहीच संबंध नसताना मला त्यात आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी

प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक प्रभारी, •महायुतीतील तीन मंत्र्यांची समन्वय समिती, मित्रपक्षांवर टीका-टिप्पणी न