New Mumbai Airport Connectivity: विक्रोळी ते कोपरखैरणेपर्यंत नव्या खाडीपुलाचे बांधकाम

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येत्या काही महिन्यांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विमानतळाच्या दिशेने सुलभ वाहतूक करता यावी यासाठी, विक्रोळी ते कोपरखैरणेपर्यंत नव्या खाडीपुलाच्या बांधकामाला देखील सुरूवात होण्याची शक्यता आहे. 


हा प्रकल्प विमानतळापर्यंतची वाहतूक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या अनेक प्रकल्पांपैकी एक आहे. ठाणे आणि नवी मुंबई विमानतळ दरम्यानच्या बहुचर्चित उन्नत रस्त्याच्या एका लेनला कोपरखैरणे-विक्रोळी लिंक रोडशी जोडण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे, पूर्व द्रुतगती महामार्गापासून नवी मुंबईपर्यंतच्या या बहुप्रतिक्षित लिंक रोडचे काम देखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने या मार्गावर घणसोली आणि ऐरोली दरम्यान पाम बीच रोड रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे, ज्यामुळे लवकरच सील-महापे रोड ते पूर्व उपनगरांमध्ये जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होईल.



₹६,३६३ कोटी नियोजित


ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या उन्नत रस्त्याच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारने अलीकडेच ₹६,३६३ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. हा प्रकल्प टोल मॉडेलद्वारे "बांधा, वापरा, हस्तांतरित करा" या तत्त्वावर राबविला जाईल. याद्वारे विविध कनेक्टिंग मार्गांवरून विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना टोल भरावा लागेल.  


सध्या वाशी येथील दोन तर ऐरोली-मुलुंड खाडी पुलामार्गे मुंबई - नवी मुंबई असा प्रवास करणे सोयीचे ठरते. पुर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या मुलुंड, कांजुरमार्ग, भांडुप या उपनगरांमधून नवी मुंबईत येजा करताना मोठ्या प्रमाणावर ऐरोली-मुलुंड खाडीपुलाचा वापर केला जातो.


नवी मुंबईतून मुंबईतील पश्चिम उपनगरांच्या विशेषत: जोगेश्वरी ते कांदिवली या भागात ये-जा करण्यासाठी याच पुलाचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे अलीकडच्या काळात मुलुंड-ऐरोली खाडीपूल आणि ठाणे-बेलापूर रस्त्यावर वाहनांचा भार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळीपासून कोपरखैरणेपर्यंत खाडीपुलाचा आणखी एक पर्याय असावा याविषयी सातत्याने चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

Good Hair : केस गळतायत? मग आहारात नक्की समाविष्ट करा 'हे' ८ पदार्थ; केस होतील मजबूत आणि दाट

मुंबई : बदलती जीवनशैली, ताणतणाव, प्रदूषण आणि अयोग्य आहार यामुळे केस गळणे, केस पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे या

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

Crime News : सिंगापूरमध्ये बनावट हिऱ्याच्या मदतीने 2 लाख डॉलरच्या हिऱ्याची चोरी; दोन भारतीयांना अटक

नवी दिल्ली : सिंगापूरच्या चायनाटाउनमधील एका दागिन्यांच्या दुकानातून सुमारे 2 लाख सिंगापूर डॉलर (1.54 लाख अमेरिकी

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Uniform Civil Code : मध्यप्रदेश विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मंजूर

भोपाळ : मध्यप्रदेश विधानसभेत मोठ्या गदारोळात समान नागरी संहिता (ucc) विधेयक मंजूर करण्यात आले. उत्तराखंड, गुजरात

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक