New Mumbai Airport Connectivity: विक्रोळी ते कोपरखैरणेपर्यंत नव्या खाडीपुलाचे बांधकाम

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येत्या काही महिन्यांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विमानतळाच्या दिशेने सुलभ वाहतूक करता यावी यासाठी, विक्रोळी ते कोपरखैरणेपर्यंत नव्या खाडीपुलाच्या बांधकामाला देखील सुरूवात होण्याची शक्यता आहे. 


हा प्रकल्प विमानतळापर्यंतची वाहतूक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या अनेक प्रकल्पांपैकी एक आहे. ठाणे आणि नवी मुंबई विमानतळ दरम्यानच्या बहुचर्चित उन्नत रस्त्याच्या एका लेनला कोपरखैरणे-विक्रोळी लिंक रोडशी जोडण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे, पूर्व द्रुतगती महामार्गापासून नवी मुंबईपर्यंतच्या या बहुप्रतिक्षित लिंक रोडचे काम देखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने या मार्गावर घणसोली आणि ऐरोली दरम्यान पाम बीच रोड रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे, ज्यामुळे लवकरच सील-महापे रोड ते पूर्व उपनगरांमध्ये जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होईल.



₹६,३६३ कोटी नियोजित


ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या उन्नत रस्त्याच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारने अलीकडेच ₹६,३६३ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. हा प्रकल्प टोल मॉडेलद्वारे "बांधा, वापरा, हस्तांतरित करा" या तत्त्वावर राबविला जाईल. याद्वारे विविध कनेक्टिंग मार्गांवरून विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना टोल भरावा लागेल.  


सध्या वाशी येथील दोन तर ऐरोली-मुलुंड खाडी पुलामार्गे मुंबई - नवी मुंबई असा प्रवास करणे सोयीचे ठरते. पुर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या मुलुंड, कांजुरमार्ग, भांडुप या उपनगरांमधून नवी मुंबईत येजा करताना मोठ्या प्रमाणावर ऐरोली-मुलुंड खाडीपुलाचा वापर केला जातो.


नवी मुंबईतून मुंबईतील पश्चिम उपनगरांच्या विशेषत: जोगेश्वरी ते कांदिवली या भागात ये-जा करण्यासाठी याच पुलाचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे अलीकडच्या काळात मुलुंड-ऐरोली खाडीपूल आणि ठाणे-बेलापूर रस्त्यावर वाहनांचा भार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळीपासून कोपरखैरणेपर्यंत खाडीपुलाचा आणखी एक पर्याय असावा याविषयी सातत्याने चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव