New Mumbai Airport Connectivity: विक्रोळी ते कोपरखैरणेपर्यंत नव्या खाडीपुलाचे बांधकाम

नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येत्या काही महिन्यांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विमानतळाच्या दिशेने सुलभ वाहतूक करता यावी यासाठी, विक्रोळी ते कोपरखैरणेपर्यंत नव्या खाडीपुलाच्या बांधकामाला देखील सुरूवात होण्याची शक्यता आहे. 


हा प्रकल्प विमानतळापर्यंतची वाहतूक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या अनेक प्रकल्पांपैकी एक आहे. ठाणे आणि नवी मुंबई विमानतळ दरम्यानच्या बहुचर्चित उन्नत रस्त्याच्या एका लेनला कोपरखैरणे-विक्रोळी लिंक रोडशी जोडण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे, पूर्व द्रुतगती महामार्गापासून नवी मुंबईपर्यंतच्या या बहुप्रतिक्षित लिंक रोडचे काम देखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने या मार्गावर घणसोली आणि ऐरोली दरम्यान पाम बीच रोड रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे, ज्यामुळे लवकरच सील-महापे रोड ते पूर्व उपनगरांमध्ये जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होईल.



₹६,३६३ कोटी नियोजित


ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या उन्नत रस्त्याच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारने अलीकडेच ₹६,३६३ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. हा प्रकल्प टोल मॉडेलद्वारे "बांधा, वापरा, हस्तांतरित करा" या तत्त्वावर राबविला जाईल. याद्वारे विविध कनेक्टिंग मार्गांवरून विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना टोल भरावा लागेल.  


सध्या वाशी येथील दोन तर ऐरोली-मुलुंड खाडी पुलामार्गे मुंबई - नवी मुंबई असा प्रवास करणे सोयीचे ठरते. पुर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या मुलुंड, कांजुरमार्ग, भांडुप या उपनगरांमधून नवी मुंबईत येजा करताना मोठ्या प्रमाणावर ऐरोली-मुलुंड खाडीपुलाचा वापर केला जातो.


नवी मुंबईतून मुंबईतील पश्चिम उपनगरांच्या विशेषत: जोगेश्वरी ते कांदिवली या भागात ये-जा करण्यासाठी याच पुलाचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे अलीकडच्या काळात मुलुंड-ऐरोली खाडीपूल आणि ठाणे-बेलापूर रस्त्यावर वाहनांचा भार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरून विक्रोळीपासून कोपरखैरणेपर्यंत खाडीपुलाचा आणखी एक पर्याय असावा याविषयी सातत्याने चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत

राज्यातील शाळांमध्ये ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण मिळणार

मुंबई : पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने

भारतात किती आहे LPG चा साठा ? दररोज किती आवश्यक आहे आणि आपली व्यवस्था समजून घ्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे भारतासह जगभर तेल आणि

इलेक्ट्रॉनिक जॅमर सक्रीय, समुद्रात जहाजांची वाहतूक कोलमडली

तेहरान : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धाचा एक भाग म्हणून शत्रू देशांनी

ठाणे, पुणे नागपूरसह ११ जिल्ह्यांत होणार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये

प्रशासकीय भार हलका करण्यासाठी निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील वाढती