उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे, निरोगी रहाणे गरजेचे असते. आतड्याचे आरोग्य हे सर्वात महत्वाचं आहे. ते निरोगी नसेल तर अनेक आजार होतात. म्हणून यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. काहीसुद्धा खाल्लं कि ऍसिडिटी होणे, पोट बाहेर येणे यासाठी अनेक गोळ्या, सप्लिमेंट घेत असाल तर त्यापेक्षा सकस आहार घेऊन आपल्या आतड्याची काळजी घेऊ शकतो.

लिंबू पाणी प्या..

सकाळी उठल्यावर लिंबाचे पाणी प्यायलात तर रक्तातील क्षार वाढतील. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होईल तसेच पचनक्रिया सुधारेल.

सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक आहार..

सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही अंड्याचा पांढरा भाग, फळे, नारळपाणी याचा समावेश करू शकता.

दुपारचे जेवण म्हणजे शाकाहारी थाळी..

ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या भाकरीसोबत पालेभाज्या, कडधान्य, ताक, काकडी, गाजर, बीटाची कोशिंबीर याचा समावेश असेल तर आरोग्य उत्तम रहाते.

संध्याकाळचा नाश्ता तेलकट नसावा..

संध्याकाळ झाली कि चहा सोबत चटपटीत खायला मिळावं असं सर्वांना वाटतं. पण त्याऐवजी चणे, शेंगदाणे, कुरमुरे असं खाऊन भूक आणि तब्येत दोन्ही सांभाळू शकता.

रात्रीचे जेवण हलके घ्या..

रात्रीच्या जेवणात सूप, सलाड, हिरव्या भाज्या, डाळ-भात असा साधा आहार केला तर पचायला सोपे जाते.

Comments
Add Comment

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन