मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर


मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा अखेर मुहूर्त सापडल्याने मुंबई ते कोकण हा प्रवास आता सुकर होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर रो-रो फेरीसेवा सुरू होण्याची शक्यता असल्याने कोकणवासीयांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई ते कोकण यादरम्यान प्रवासी व वाहनांसाठीची रो-रो फेरीसेवा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी सुरू असून, सागरी महामंडळाने कंबर कसली आहे.


काही महिन्यांपासून केंद्र व राज्यस्तरीय परवानग्या, हवामान अडथळे आणि तांत्रिक कारणांमुळे ही सेवा वारंवार पुढे ढकलली जात होती. गणेशोत्सवात ही सेवा सुरू होईल, अशाप्रकारे नियोजन सुरू होते, मात्र आता सर्व परवानग्या मिळाल्या असून, समुद्रस्थितीही अनुकूल होत आहे. .


सागरी महामंडळाने बोटीची सेवा सुरुवात करण्यासाठी तांत्रिक व प्रशासनिक तयारी पूर्ण केली आहे. जेट्टीवर प्रवाशांसाठी बैठकीची सोय, वाहनांसाठी स्वतंत्र लोडिंग-विचार केंद्र, तसेच सुरक्षित उतार व चढाव यासाठी योग्य उपाययोजना केली जात आहे. जयगड आणि विजयदुर्ग येथे जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच हवामान अहवालावर नजर ठेवून समुद्रस्थिती अनुकूल असल्यास ताबडतोब सेवा सुरू करण्याचे प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. सणासुदीच्या काळात हजारो प्रवासी कोकणात आपल्या गावी जाण्यास निघतात. महामार्गावर तासनतास होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, रेल्वेत तिकिटासाठीची धावपळ यामुळे प्रवास त्रासदायक ठरत होता. रो-रो सेवेमुळे सुरक्षित, जलद व आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. गणेशोत्सवात सेवा न मिळाल्याने नाराजी होती, पण नवरात्रोत्सवात ही सेवा सुरू होणार असल्याचे ऐकून आम्हाला आनंद झाला आहे. मुंबई ते कोकण प्रवासाला नवा पर्याय मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.


काही महिन्यांपासून केंद्र व राज्यस्तरीय परवानग्या, हवामान अडथळे व तांत्रिक कारणांमुळे ही सेवा वारंवार पुढे ढकलली जात होती. गणेशोत्सवात ही सेवा सुरू होईल, अशाप्रकारे नियोजन सुरू होते. तेव्हा तांत्रिक कारणांमुळे ही सेवा सुरू झाली नाही. आता सर्व आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून हवामानही स्थिर आहे.


सेवा कशी असेल?


भाऊचा धक्का (मुंबई) येथून जयगड आणि विजयदुर्गपर्यंत या बोटी धावणार आहेत.
प्रवास वेळ : मुंबई - रत्नागिरी ३ ते ३.५ तास, मुंबई-सिंधुदुर्ग ५ तास
वेग : २५ नॉट्स दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट


यशस्वी चाचणी
मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मार्गावर रो-रो सेवेची प्रायोगिक चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. वेग, प्रवासी क्षमता व सुरक्षा तपासणी समाधानकारक ठरली असून, सागरी सुरक्षा यंत्रणांकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे.


आसन क्षमता
५५२ प्रवासी (इकोनॉमी )
४४ (प्रीमियम इकोनॉमी)
४८ (बिझनेस)
१२ (फर्स्ट क्लास)


वाहन क्षमता
५० चारचाकी व ३० दुचाकी


तिकीटदर




  • इकोनॉमी - २,५०० रु.

  • प्रीमियम इकोनॉमी - ४,००० रु.

  • बिझनेस - ७,५०० रु.

  • फर्स्ट क्लास - ९००० रु.

  • वाहनांचे दर

  • चारचाकी - ६००० रु.

  • दुचाकी - १००० रु.

  • सायकल - ६०० रु.

  • मिनी बस - १३,००० रु

Comments
Add Comment

Marathi Conversation Guide : रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मराठी संवाद मार्गदर्शिका

मुंबई : महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी भाषेत संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या

International Drug Racket Busted : ‘ऑपरेशन क्लीन मुंबई’! १७४५ कोटींचं कोकेन जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा मोठा पर्दाफाश

मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मुंबईत धडक कारवाई करत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यामुळे नाही तर यामुळे गेले संपूर्ण कुटुंबाचे प्राण; फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर

मुंबई : पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मुंबई हादरली होती. सुरुवातीला कलिंगड

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी