काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पण निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणे टाळले. या प्रकरणात चौकशी सुरू झाली आणि राहुल गांधींच्या काही आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे आढळले. तर काही ठिकाणी जिथे काँग्रेस उमेदवारांचा विजय झाला होता तिथेच बोगस मतदार नोंदणी झाली असल्याचे तसेच काही मतदारांची नावं वगळण्यात आल्याचे आढळले. यानंतर लवकरच होणार असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने मतदारयादीची सखोल छाननी अर्थात एसआयआर (Special Intensive Revision - SIR) सुरू केली. या प्रक्रियेला काँग्रेसने कडाडून विरोध केला. काँग्रेसचे हे अनाकलनीय वर्तन अद्याप सुरूच आहे. आता काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जात आहेत, असा नवा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

अ व्यक्ती जीवंत नाही अशी तक्रार ब व्यक्तीच्या नावे क व्यक्ती करते. ही क व्यक्ती कोणाला दिसत नाही की माहिती नाही. पण या तक्रारींची दखल घेऊन नावं गायब केली जातात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत अ आणि ब व्यक्तींना मंचावर येऊन बोलायला परवानगी दिली. पण क व्यक्तीबाबत कोणाताही ठोस साक्षी - पुरावा अद्याप निवडणूक आयोगाला सादर केलेला नाही. यामुळे आधीच्या आरोपांसारखेच नवे आरोप बिनबुडाचे ठरणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

माझं देशावर, संविधानावर आणि लोकशाहीवर प्रेम आहे; असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस समर्थक मतदारांचीच नावं मतदारयादीतून गायब केली जात असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता आहे. याच कर्नाटकमधील आलंद मतदारसंघातून सहा हजार १८ मतं गायब करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. नावं गायब करण्याचं काम एक वेगळी शक्ती करत आहे, असे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांनी हा दावा करताना त्या शक्तीबाबतचा ठोस पुरावा सादर करणे टाळले.
Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे