काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पण निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणे टाळले. या प्रकरणात चौकशी सुरू झाली आणि राहुल गांधींच्या काही आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे आढळले. तर काही ठिकाणी जिथे काँग्रेस उमेदवारांचा विजय झाला होता तिथेच बोगस मतदार नोंदणी झाली असल्याचे तसेच काही मतदारांची नावं वगळण्यात आल्याचे आढळले. यानंतर लवकरच होणार असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने मतदारयादीची सखोल छाननी अर्थात एसआयआर (Special Intensive Revision - SIR) सुरू केली. या प्रक्रियेला काँग्रेसने कडाडून विरोध केला. काँग्रेसचे हे अनाकलनीय वर्तन अद्याप सुरूच आहे. आता काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जात आहेत, असा नवा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

अ व्यक्ती जीवंत नाही अशी तक्रार ब व्यक्तीच्या नावे क व्यक्ती करते. ही क व्यक्ती कोणाला दिसत नाही की माहिती नाही. पण या तक्रारींची दखल घेऊन नावं गायब केली जातात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत अ आणि ब व्यक्तींना मंचावर येऊन बोलायला परवानगी दिली. पण क व्यक्तीबाबत कोणाताही ठोस साक्षी - पुरावा अद्याप निवडणूक आयोगाला सादर केलेला नाही. यामुळे आधीच्या आरोपांसारखेच नवे आरोप बिनबुडाचे ठरणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

माझं देशावर, संविधानावर आणि लोकशाहीवर प्रेम आहे; असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस समर्थक मतदारांचीच नावं मतदारयादीतून गायब केली जात असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता आहे. याच कर्नाटकमधील आलंद मतदारसंघातून सहा हजार १८ मतं गायब करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. नावं गायब करण्याचं काम एक वेगळी शक्ती करत आहे, असे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांनी हा दावा करताना त्या शक्तीबाबतचा ठोस पुरावा सादर करणे टाळले.
Comments
Add Comment

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या