काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. पण निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणे टाळले. या प्रकरणात चौकशी सुरू झाली आणि राहुल गांधींच्या काही आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे आढळले. तर काही ठिकाणी जिथे काँग्रेस उमेदवारांचा विजय झाला होता तिथेच बोगस मतदार नोंदणी झाली असल्याचे तसेच काही मतदारांची नावं वगळण्यात आल्याचे आढळले. यानंतर लवकरच होणार असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने मतदारयादीची सखोल छाननी अर्थात एसआयआर (Special Intensive Revision - SIR) सुरू केली. या प्रक्रियेला काँग्रेसने कडाडून विरोध केला. काँग्रेसचे हे अनाकलनीय वर्तन अद्याप सुरूच आहे. आता काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जात आहेत, असा नवा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

अ व्यक्ती जीवंत नाही अशी तक्रार ब व्यक्तीच्या नावे क व्यक्ती करते. ही क व्यक्ती कोणाला दिसत नाही की माहिती नाही. पण या तक्रारींची दखल घेऊन नावं गायब केली जातात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत अ आणि ब व्यक्तींना मंचावर येऊन बोलायला परवानगी दिली. पण क व्यक्तीबाबत कोणाताही ठोस साक्षी - पुरावा अद्याप निवडणूक आयोगाला सादर केलेला नाही. यामुळे आधीच्या आरोपांसारखेच नवे आरोप बिनबुडाचे ठरणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

माझं देशावर, संविधानावर आणि लोकशाहीवर प्रेम आहे; असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस समर्थक मतदारांचीच नावं मतदारयादीतून गायब केली जात असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता आहे. याच कर्नाटकमधील आलंद मतदारसंघातून सहा हजार १८ मतं गायब करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. नावं गायब करण्याचं काम एक वेगळी शक्ती करत आहे, असे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांनी हा दावा करताना त्या शक्तीबाबतचा ठोस पुरावा सादर करणे टाळले.
Comments
Add Comment

Telangana Bus Accident : थरकाप उडवणारा अपघात! हायस्पीड लॉरी थेट बसमध्ये घुसली; किंचाळ्या आणि रक्ताचा सडा; २० हून अधिक लोकांचा दुर्दैवी अंत!

तेलंगणा : तेलंगणा राज्याच्या रंगारेड्डी (Rangareddy) जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल (Chevella Mandal) येथे झालेल्या एका भीषण बस

ICC Women's Cricket World Cup 2025 : जीत लिया जहां... PM मोदींनी केले अभिनंदन, तर 'मास्टर ब्लास्टर' सचिनला आठवली '१९८३' ची गाथा!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) रविवारी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर (Dr. DY Patil Stadium) एक ऐतिहासिक

Jodhpur Accident : धक्कादायक! ट्रेलरला धडकलेल्या बसमध्ये १८ भाविकांचा दुर्दैवी अंत, जोधपूर हादरले!

जयपूर : राजस्थानमधील (Rajasthan) जोधपूर (Jodhpur) जिल्ह्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी रस्ता अपघात घडला आहे. हा अपघात फलोदी

केवळ लग्नास नकार देणे भारतीय न्याय संिहतेनुसार अात्महत्येस चिथावणी ठरत नाही: सर्वोच्च न्यायालय

पुरुषाविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा खटला रद्द नवी दिल्ली : "एका तरुणीने आपले जीवन संपवण्याचे टोकाचे

पाकिस्तानची अन्न-पाणी सुरक्षा संकटात

सिंधू जलवाटप करार स्थगित केल्याचा परिणाम; सिडनीतील संस्थेचा अहवाल नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी

नौदलासाठी इस्रोने प्रक्षेपित केला उपग्रह

श्रीहरिकोटा : भारतीय नौदलाठी इस्रोने LVM3-M5/CMS-03 या रॉकेटमधून एका उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामुळे