दादरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूने समाजकंटकांचं धक्कादायक कृत्य

मुंबई : मध्य मुंबईत दादर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकून पुतळा विद्रूप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूने काही समाजकंटकांनी ही कृती केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तसेच संपूर्ण दादरमध्ये बंदोबस्त वाढवला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यांचा शोध सुरू आहे. पोलीस बंदोबस्तात पुतळ्यावर फेकण्यात आलेला रंग काढून पुतळा तसेच भोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार घडल्याचे कळताच शिवसैनिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राज्यसभा खासदार खासदार अनिल देसाई, स्थानिक आमदार महेश सावंत यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वतः जाऊन पुतळ्याचे अवलोकन केले. उद्धव ठाकरे गटाने पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. भेकड्यांच्या औलादींना प्रत्युत्तर देऊ, असे राज्यसभा खासदार खासदार अनिल देसाई म्हणाले.

याआधी काही वर्षांपूर्वी काँग्रेस आघाडी सत्तेत असताना मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला विद्रूप करण्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी मुंबईत हिंसक घटना घडल्या होत्या. सार्वजनिक संपत्तीची हानी झाली होती. यामुळे पोलीस आवश्यक ती खबरदारी घेत आहेत.
Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील