जेएनपीटीमधील मोठी बातमी! पाकिस्तानी वस्तू दुबईमार्गे भारतात, दोघांना अटक

नवी मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या व्यापाराला पूर्णपणे बंदी घातली आहे. असे असले तरी, भारतात पाकिस्तानी वस्तूंची तस्करी होत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अलीकडेच महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पथकाने दुबईमार्गे भारतात पाकिस्तानी वस्तूंची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. ही तस्करी जेएनपीटी बंदरावर केली जात होती. 


जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर,  भारत पाकिस्तानशी सर्व संबंध तोडत असताना, काही लोकं अधिकाऱ्यांचे लक्ष चुकवून दुबईमार्गे पाकिस्तानी वस्तू आयात करून कोट्यवधी रुपयांचा व्यापार करत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.


मुंबईस्थित महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने जेएनपीटी बंदरावर मोठी कारवाई केली आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) मार्गे भारतात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी वस्तूंची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत, १२ कोटी रुपयांच्या सौंदर्य प्रसाधने आणि सुक्या खजूरांनी भरलेले २८ कंटेनर जप्त करण्यात आले. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.



भारत सरकारकडून पाकिस्तानमध्ये आयात बंदी 


भारत सरकारने २ मे २०२५ पासून पाकिस्तानमधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर बंदी घातली आहे. त्यानंतर, डीआरआयने 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतात येणाऱ्या वस्तूंवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.



भारतातून पाकिस्तानला बेकायदेशीर मार्गांनी पैसे पाठवले जात होते


हाती आलेल्या माहितीनुसार, दुबईस्थित हा पुरवठादार कमिशनवर काम करत होता आणि त्याच्या कंपन्यांचा वापर बेकायदेशीर मार्गांनी भारतातून पाकिस्तानला पैसे हस्तांतरित करण्यासाठी केला जात होता. भारत सरकारच्या कठोर योजना असूनही, मूळ देशाबद्दल खोटी माहिती आणि आणि खोट्या शिपिंग कागदपत्राद्वारे फसव्या शिपमेंट अद्याप सुरूच आहेत. म्हणूनच, यावर कठोर कायदे आणि अंमलबजावणीची मागणी आता जोर धरत आहे.


Comments
Add Comment

Indian Air Force AN-32 Plane Crashes : आसाममध्ये हवाई दलाच्या AN-३२ विमानाचा भीषण अपघात; पायलटसह ५ जवान शहीद, सहवैमानिक गंभीर जखमी

आसाम : आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या एअरफोर्स स्टेशनवर शनिवारी सकाळी झालेल्या AN-३२ मालवाहू

Short Film : राज्य शासनाकडून बालचित्रपट निर्मितीला चालना; माहितीपट व लघुपटांसाठी अर्थसहाय्यात मोठी वाढ

मुंबई, राज्यातील दर्जेदार माहितीपट, लघुपट आणि बालचित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने

Ashish Shelar : आपत्कालीन परिस्थितीचा इंटिग्रेटेड प्लँन करा

मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांची रेल्वे, महापालिका, बेस्टला सूचना मुंबई, पावसाळ्यात पूर परिस्थितीचे

Sandeep Deshpande : मनसे आणि जैन धर्मगुरूंमध्ये वादाची ठिणगी

मुंबई : मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्या आणि सार्वजनिक रस्त्यांवर जैन धर्मगुरूंच्या येण्या-जाण्यासाठी मारण्यात

IND vs AFG 1st ODI : पावसामुळे पहिला सामना वाहून जाणार ? रोहित शर्माच्या पुनरागमनावर संकट

धर्मशाळेत टॉसही लांबला धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला

Kalyan ST Bus : आगार स्थलांतरामुळे एसटी प्रवाशांचे हाल; सहा महिन्यांपासून विठ्ठलवाडीपर्यंतच प्रवास

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्प आणि उड्डाणपूल बांधकामामुळे वाहतूक