आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन थांबवण्यासाठी फडणवीस सरकारने त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्याचे सांगत जीआर काढला होता.या जीआरवरुन ओबीसी समाजाने नाराजी व्यक्त केली होती. पण ओबीसींवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन जीआर काढल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले होते. जरांगेंची हैदराबाद गॅझेटियरची मागणी मान्य करत जीआर काढल्याचे राज्य शासनाकडून सांगण्यात आले. पण या जीआरला आव्हान देण्यात आले आहे. यामुळे आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.


जीआर विरोधात दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. या याचिकांच्या सुनावणीसाठी तारखा जाहीर झाल्या आहेत. अ‍ॅड.विनीत धोत्रे यांनी केलेल्या जनहित याचिकेवर १८ सप्टेंबरला तर शिवा संघटनेच्या याचिकेवर २५ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. राज्य शासनाने २ सप्टेंबर रोजी जारी केलेला जीआर रद्द करा तसेच सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ओबीसी जात प्रमाणपत्र न देण्याची याचिकाकर्त्यांनी केली आहे. उपसमितीला कोणताही अधिकार नाही, तिची नेमणूकही चुकीची असून ती रद्द करा, अशी मागणीही करण्यात आली आहे. हैदरबाद गॅझेटच्या नोंदी कालबाह्य आहेत. कालबाह्य झालेल्या नोंदींच्याआधारे जीआर कसा काढू शकता ? असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे.


जीआरला आव्हान देण्यात आल्यामुळे मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून दिल्या जाणार असलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिले आहेत. याचाही अप्रत्यक्ष परिणाम होण्याची आणि आरक्षणाची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,

Panvel Karjat Local Train: पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: पनवेल आणि कर्जत या दोन्ही स्थानकांना जोडणारा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. तसे पाहिले तर पनवेल आणि कर्जत