'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कोकणची लोककला असलेल्या दशावतार सिनेमाच्या माध्यमातून एक आगळावेगळा संदेश देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.


दरम्यान, त्याचा हा प्रयत्न प्रेक्षकांनाही आवडत आहे. त्यामुळे प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवसापासूनच सिनेमागृहांमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. या सिनेमाने जबरदस्त कमाईचा आकडाही गाठला आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही या सिनेमाचे भरभरून कौतुक केले आहे. त्यांनी या सिनेमात दाखवलेल्या विषयावर भाष्य केले आहे.


गंभीर विषयाला या चित्रपटाने हात घातला आहे. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राला मी हीच गोष्ट सांगत आहे की आपल्याकडच्या जमिनी वाचवा. कारण जमिनी हे तुमचं अस्तित्व आहे. हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे ही फक्त एकट्या कोकणामध्ये होतो असा भाग नाही. अत्यंत चालाखीने चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय मांडला आहे




दशावताराच्या सर्व रूपांमधून ती गोष्ट समोर आणली. मी चित्रपटाची कथा सांगत नाही पण अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रण, संगीत आणि दिग्दर्शक सुबोध जरी असला संपूर्ण महाराष्ट्राने बोध घ्यावा असा हा चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर यांनी उत्तम काम केले आहे हे अत्यंत छोटे वाक्य आहे कारण ते खूप मोठे आहेत. कमाल केली त्यांनी. बाकीचेही आहेत कलाकार त्यांनीही उत्तम काम केलं. महेश मांजरेकर यांनी सुद्धा उत्तम काम केलं...


सर्वांनी साजेस काम केलं. प्रियदर्शनी यांनी सुद्धा उत्तम काम केलं. मनोरंजन नक्कीच आहे या चित्रपटात पण फक्त मनोरंजन म्हणून हा चित्रपट नाही पाहिला पाहिजे. तर महाराष्ट्रातील अत्यंत गंभीर विषयात या चित्रपटाने हात घातला आहे म्हणून हा चित्रपट पाहिला पाहिजे..


अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी सिनेमा पाहिल्यावर दिली.

Comments
Add Comment

Shocking Video : किळसवाणा प्रकार! दादरमध्ये इडली बनवण्यासाठी चक्क शौचालयाच्या पाण्याचा वापर; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : कामावर जाण्याची घाई आणि वेळेची कमतरता यामुळे अनेक मुंबईकर चाकरमानी सकाळचा नाश्ता रेल्वे स्टेशनबाहेरील

Passengers Stranded At Mumbai Airport : मुंबईत एअर इंडियाची विमानसेवा कोलमडली; ताटकळलेल्या प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) १८ मे रोजी एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया

Sion Flyover Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सायन उड्डाणपूल १५ ऑगस्टला खुला होण्याची शक्यता

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शीव (Sion)

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे अंधेरीतील लाडक्या बहिणींचा

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू