Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. आता करदात्यांना 15 सप्टेंबरऐवजी 16 सप्टेंबर 2025 पर्यंत त्यांचे रिटर्न दाखल करता येणार आहेत.

ही मुदतवाढ 15 सप्टेंबर रोजी अनेक करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर तांत्रिक अडचणी आणि प्रचंड ट्रॅफिकचा सामना करावा लागल्यामुळे देण्यात आली आहे. यामुळे लाखो लोकांना शेवटच्या दिवशी रिटर्न भरण्यात अडचणी येत होत्या. अनेक चार्टर्ड अकाउंटंट आणि करदात्यांनी सोशल मीडियावर याबद्दल तक्रारी केल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेऊन, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) रिटर्न भरण्याची अंतिम तारीख एक दिवसाने वाढवण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती आयकर विभागाने त्यांच्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर दिली आहे.

 



या निर्णयामुळे ज्या करदात्यांनी अद्याप आपले रिटर्न भरले नाहीत, त्यांना आता विलंब शुल्क आणि दंडापासून वाचण्यासाठी आणखी एक दिवस मिळाला आहे. करदात्यांनी 16 सप्टेंबर 2025 पर्यंत आपले रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे.
Comments
Add Comment

Israel - Iran War : भारतीय दूतावासाकडून इस्रायलमधील नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आंध्र प्रदेशच्या काकीनाड्यातील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेश राज्यातील काकीनाडा जिल्हा येथील सामरलकोट मंडलमधील वेटलापालेम गावात एका फटाका निर्मिती

INS Anjdip : शत्रूला धडकी भरणार! 'आयएनएस अंजदीप' भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

चेन्नई : आयएनएस अंजदीप, ही पाणबुडी विरोधी युद्धनौका , ‘शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील

National Science Day 2026 : विकास आणि कल्याणासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करा - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा देत भारताच्या

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या