Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. आता करदात्यांना 15 सप्टेंबरऐवजी 16 सप्टेंबर 2025 पर्यंत त्यांचे रिटर्न दाखल करता येणार आहेत.

ही मुदतवाढ 15 सप्टेंबर रोजी अनेक करदात्यांना ई-फायलिंग पोर्टलवर तांत्रिक अडचणी आणि प्रचंड ट्रॅफिकचा सामना करावा लागल्यामुळे देण्यात आली आहे. यामुळे लाखो लोकांना शेवटच्या दिवशी रिटर्न भरण्यात अडचणी येत होत्या. अनेक चार्टर्ड अकाउंटंट आणि करदात्यांनी सोशल मीडियावर याबद्दल तक्रारी केल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेऊन, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) रिटर्न भरण्याची अंतिम तारीख एक दिवसाने वाढवण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती आयकर विभागाने त्यांच्या अधिकृत 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर दिली आहे.

 



या निर्णयामुळे ज्या करदात्यांनी अद्याप आपले रिटर्न भरले नाहीत, त्यांना आता विलंब शुल्क आणि दंडापासून वाचण्यासाठी आणखी एक दिवस मिळाला आहे. करदात्यांनी 16 सप्टेंबर 2025 पर्यंत आपले रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे.
Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही