काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या दौऱ्यांनाही सुरूवात झाली आहे. त्यातच आज भाजप पक्षाने मुंबईत विजय संकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.


तसेच आगामी महापालिका निवडणुकीत महापौर हा महायुतीचाच असणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नुकतीच मुंबईतील बेस्ट सहकारी पतपेढीची निवडणूक पार पडली होती. यात ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचा फडणवीस यांनी यावेळी दाखला दिला. या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली.



काहीही झाले तर महायुतीचाच महापौर


२०२४मध्ये राज्यात महायुतीचे सरकार आम्ही आणून दाखवले. महापालिकेच्या निवडणुकीतही पुन्हा महायुतीचे सरकारच येणार. काहीही झाले तर महायुतीचाच महापौर केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले.



निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजला


काही दिवसांपूर्वी मुंबईतील बेस्ट सहकारी पतपेढीची निवडणूक पार पडली होती. यात ठाकरे बंधूंचा पराभव झाला होता. आमच्या उमेदवारांनी त्यांच्या ब्रँडचा बँड वाजवला. लक्षात ठेवा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड होते. मात्र तुम्ही नाहीत. केवळ नाव लावल्याने कोणी ब्रँड होत नाही. आमच्या पक्षातील परंपरा बघा. आशिष शेलार यांच्यानंतर त्यांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही तर अमित साटम हे सामान्य कार्यकर्ते मुंबई भाजपचे अध्यक्ष झाले. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे. ते म्हणजे नरेंद्र मोदी. असे फडणवीस यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

बंदर कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी राज्यातील सहा आयटीआयमध्ये विशेष अभ्यासक्रम - मंत्री नितेश राणे

मुंबई: सिंधुदुर्ग, नाशिक, पालघर, औंध-पुणे, नागपूर आणि मुंबई येथील निवडक सहा आयटीआय संस्थांमध्ये बंदरे क्षेत्राशी

Maharashtra Government : महाराष्ट्रात आता ‘ड्रोन’ आणि ‘रोबोटिक्स’ची क्रांती

राज्य सरकारकडून 'स्वयंचलित प्रणाली धोरण-२०२६' जाहीर; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारनिर्मिती

Kalyan Crime : कल्याणमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना; आरोपी पती अटकेत

कल्याण: शहरात महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत कौटुंबिक वादातून पतीने

Weather Update : जुलैमध्ये पाऊस येणार ? अरबी समुद्रावरील मान्सूनचे ढग गायब

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत त्यात आता अरबी समुद्रामुळे मान्सूनचे ढग गायब झाले

Minister Adv. Shelar : कातळशिल्पांच्या वैज्ञानिक संवर्धनाला नवीन गती देण्यासाठी सामंजस्य करार

मुंबई: कोकणातील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांच्या वैज्ञानिक अभ्यास, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धनासाठी

Devendra Fadnavis : मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मिळणार मोठी बाजारपेठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या स्टॉलचे उद्घाटन मुंबई : ग्रामीण भागातील