मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून प्रवाशांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मेट्रो प्राधिकरणातर्फे असे स्पष्ट करण्यात आले आहे की, दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून पहिल्या गाड्या, आरे जेव्हीएलआर आणि आचार्य अत्रे चौक येथून सकाळी ५.५५ वाजता सुटतील. यापूर्वी या मेट्रो सकाळी ६.३० वाजता सुटत होत्या. यासह शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता सुटेल.


मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मेट्रो ३ मार्गिकेचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी मेट्रो-३ ची सेवा लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांना सकाळी ६.३० ऐवजी ५.५५ वाजल्यापासून प्रवासाला सुरुवात करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणपती दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. हे लक्षात घेऊन, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात मेट्रो ३ च्या सेवा कालावधीत रात्रीच्या वेळेत दीड तासांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर ७ सप्टेंबरपासून मात्र नियमित वेळेनुसार म्हणजेच सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेतच मेट्रो सेवा सुरू होती. या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन

राज्यात नवीन २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ सन २०५० पर्यंतचे

राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत बिरेंद्र सराफ

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक