मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून प्रवाशांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मेट्रो प्राधिकरणातर्फे असे स्पष्ट करण्यात आले आहे की, दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून पहिल्या गाड्या, आरे जेव्हीएलआर आणि आचार्य अत्रे चौक येथून सकाळी ५.५५ वाजता सुटतील. यापूर्वी या मेट्रो सकाळी ६.३० वाजता सुटत होत्या. यासह शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता सुटेल.


मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मेट्रो ३ मार्गिकेचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी मेट्रो-३ ची सेवा लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांना सकाळी ६.३० ऐवजी ५.५५ वाजल्यापासून प्रवासाला सुरुवात करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणपती दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. हे लक्षात घेऊन, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या काळात मेट्रो ३ च्या सेवा कालावधीत रात्रीच्या वेळेत दीड तासांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर ७ सप्टेंबरपासून मात्र नियमित वेळेनुसार म्हणजेच सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेतच मेट्रो सेवा सुरू होती. या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Ritu Tawde : तुमच्या घरात आयाबहिणी नाहीत का? मुंबईच्या महापाैर रितू तावडे कडाडल्या, सरळ म्हणाल्या...

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्या घशाच्या आजाराबाबत केलेल्या एका विधानामुळे सध्या राजकीय

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डचे लोकार्पण

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि

Proposal for Bridge and Road Widening: मालाड पश्चिमेतील पुल आणि रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव सुमारे २५ टक्के उणे दरात

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीची सत्ता आल्यानंतर

Ashwini Bhide: मुंबई महापालिका आयुक्तपदी आश्विनी भिडे याच का हव्या होत्या? काय आहे कारण..

मुंबई: मुंबई महापालिका आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत सुरु असलेल्या चर्चांवर सोमवारी रात्री अर्धा पडदा

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव संपन्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: भगवान महावीरांनी शांतीचा आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. सेवाकार्यात नेहमीच अग्रेसर राहून जैन समाजाने

Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही