मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.


विभागात ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली नांदेड या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली .पुराचे पाणी शेतात घुसल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. मराठवाड्यात सर्वदूर पूर परिस्थिती असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.


सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बीड जिल्ह्याला बसला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज शाळांना सुट्टी दिली आहे.


बीड जिल्ह्यातील नळवंडी, नेकनूर, येळंबघाट, कडा, टाकळसिंग, डवळा वडगाव, धानोरा, पिंपळा, दादेगाव, पाटोदा, लोखंडी, केज, युसूफ, होळ आणि शिरुर या मंडळात अतिवृष्टी झाली.


लातूर जिल्ह्यातील लातूर, कासारखेडा, मोघा, तोंडार आणि धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी, पडोळी, कासेगाव, तुळजापूर, अनाळा, कळंब, इटकूर या मंडळात अतिवृष्टी झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.


परभणी जिल्ह्यातील परभणी, माखणी, बोरी, दुधगाव आणि हिंगोली जिल्ह्यातील वाकोडी, डोंगरकडा मंडळात अतिवृष्टी झाली असून प्रशासन सतर्क आहे


शिरुर मंडळात १०४ मिमी पाऊस झाला.


बीड जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस झाल्यानंतर केकाणवाडी पाझर तलाव आणि राक्षसवाडी साठवण तलाव फुटला. पुलावर पाणी आल्यामुळे गावांचा संपर्क तुटला.


सिल्लोड तालुक्यातील आमठाणा मंडळांमध्ये तीन ते सहापर्यंत अतिवृष्टी होऊन ७० मिमी पावसाची नोंद झाली. देऊळगाव बाजार येथे चारना नदीला पूर आल्यामुळे नागरिकांना नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.


मराठवाड्यात चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.


विशेषत: बीड जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, केज तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. पूर परिस्थितीमुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. मराठवाड्यात ३२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. आष्टी तालुक्यातील कडा, पिंपरखेड, निमगाव चोभा या भागामध्ये सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे कांबळी, कडी नदीला महापूर आला. धामणगाव येथील अफरोज बागवान (वय ३०) व घाटा पिंपरी येथील श्रावण तुकाराम शिंदे (वय ५९) हे पुरात वाहून गेले. अचानक मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी लोकवस्त्यांमध्ये शिरल्याने नागरिक पुरात अडकले. पुरात अडकलेल्यांना लष्कराच्या हेलिकॉप्टरमधून ५१ जणांना बाहेर काढण्यात आले.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी

Jalgaon Crime : नवरा-बायकोमधील भांडणाचा धक्कादायक शेवट ! आई अन् मुलाने थेट...

Jalgaon Crime News : नवरा बायको यांच्यामध्ये होणारे आणि नंतर टोकाले पोहोचलेले वाद क्षणाधार्त आयुष्याची कशी राखरांगोळी करू