ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन


मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे आणि सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


रविवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या नवी मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. ज्याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर झाला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे लोकल गाड्यांचा वेगही मंदावला. अनेक ठिकाणी झाडे आणि भिंती पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.


हवामान खात्याकडून बेलापूरमध्ये २४ तासांत १५९ मिमी आणि नेरुळमध्ये १३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 


वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोलीमध्ये पाणी साचल्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यासही अडचण आली. रेल्वे स्टेशन आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने ऑफिस, शाळा-कॉलेजला जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. पनवेलच्या कुंभारवाडा भागात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. सततच्या पावसामुळे घरात पाणी शिरले, ज्यामुळे लोकांच्या सामानाचे नुकसान झाले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी मिळून मदतकार्य सुरू केले.  भाजपच्या माजी नगरसेविका रेणुका मोहकर आणि शिवसेना नेत्या किरण कलवेकर यांच्यासह इतरांनी बाधित नागरिकांना चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली. 



सोमवारी हवामान कसे असेल?


सोमवारी दिवसभर हलका पाऊस पडत असला तरी, धोका अद्याप संपलेला नाही. नवी मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या, बेलापूर आणि नेरुळ भागात मुसळधार पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, पुढील ४८ तासांत जोरदार वारे आणि विजांसह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local : कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास मनस्तापाचा ठरला. कल्याण स्थानकावर अचानक सिग्नल यंत्रणेत

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी

KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक