ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन


मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे आणि सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


रविवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या नवी मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. ज्याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर झाला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे लोकल गाड्यांचा वेगही मंदावला. अनेक ठिकाणी झाडे आणि भिंती पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.


हवामान खात्याकडून बेलापूरमध्ये २४ तासांत १५९ मिमी आणि नेरुळमध्ये १३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 


वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोलीमध्ये पाणी साचल्यामुळे लोकांना घराबाहेर पडण्यासही अडचण आली. रेल्वे स्टेशन आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने ऑफिस, शाळा-कॉलेजला जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला. पनवेलच्या कुंभारवाडा भागात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. सततच्या पावसामुळे घरात पाणी शिरले, ज्यामुळे लोकांच्या सामानाचे नुकसान झाले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी मिळून मदतकार्य सुरू केले.  भाजपच्या माजी नगरसेविका रेणुका मोहकर आणि शिवसेना नेत्या किरण कलवेकर यांच्यासह इतरांनी बाधित नागरिकांना चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली. 



सोमवारी हवामान कसे असेल?


सोमवारी दिवसभर हलका पाऊस पडत असला तरी, धोका अद्याप संपलेला नाही. नवी मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या, बेलापूर आणि नेरुळ भागात मुसळधार पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, पुढील ४८ तासांत जोरदार वारे आणि विजांसह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या