सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको चाचण्यांचे नेतृत्व केले. सोलापूर विभागातील ढवळस आणि भालवणी स्थानकांदरम्यान २६ किमी अंतरावर केलेली ही पहिली ‘कवच’ चाचणी आहे. यावेळी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता मनिंदर सिंग उप्पल, सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजीत मिश्रा आणि मुख्यालय आणि सोलापूर विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील चाचणी दरम्यान उपस्थित होते.


लोको चाचण्यांदरम्यान, कवच प्रणालीच्या महत्त्वपूर्ण सुरक्षा वैशिष्ट्यांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये स्टॉप सिग्नलवर SPAD (सिग्नल पास अॅट डेंजर) चाचणी, ब्लॉक सेक्शन SOS (इमर्जन्सी) जनरेशन, स्टेशन मास्टर SOS (इमर्जन्सी) जनरेशन, टर्नआउट्सवर ओव्हरस्पीड प्रतिबंध चाचण्या घेण्यात आल्या.


यावेळी श्री धर्मवीर मीणा म्हणाले की “सोलापूर विभागात कवचची यशस्वी चाचणी ही या स्वदेशी सुरक्षा प्रणालीच्या अमलबजावणीतील एक महत्त्वाचा क्षण आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि ऑपरेशनल कार्यक्षमता यांच्या सर्वोच्च पातळीची खात्री करण्यावर भारतीय रेल्वेचे अढळ लक्ष प्रतिबिंबित करते.” मध्य रेल्वेमध्ये कवचच्या अमलबजावणीसाठीची निविदा ३० मार्च २०२५ रोजी देण्यात आली आणि सोलापूर विभागात ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत लोको चाचण्या यशस्वीपणे पार पाडणे हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा